शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे: रविंद्र चव्हाण

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 08, 2022 5:07 PM

कोकणातील १० आदर्श संस्थाचालक व ११५ शिक्षकांना पुरस्कार प्रदान

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : समर्थ भारताची निर्मिती ही पुढच्या पिढीमधून होणार आहे. त्यादृष्टीकोनातून नवी पिढी घडविण्याचा शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच विविध भागात काम करताना एखादा विषय सखोल आत्मसात करून स्वत:ची ओळख निर्माण करावी. वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ मिळणारा हा पुरस्कार गुणवंत शिक्षकांना सदैव प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.

विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्ताने समन्वय प्रतिष्ठानतर्फे व भाजपा शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील ११५ आदर्श शिक्षक आणि १० संस्थाचालकांचा वसंत स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.ठाण्यातील एम. एच. हायस्कूलच्या सभागृहात आज झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री रविंद्र चव्हाण बोलत होते. या वेळी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील माजी गटनेते संजय वाघुले,मनोहर डुंबरे, नारायण पवार,माजी नगरसेवक भरत चव्हाण,कृष्णा पाटील,जिल्हा हौसिंग फेडरेशनचे सिताराम राणे,परिवहन समितीचे सदस्य विकास पाटील,भाजपाचे शहर सरचिटणीस मनोहर सुगदरे, विरसिंग पारछा, एम. एच. हायस्कूलचे माजी प्राचार्य राजेंद्र रजपूत,भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील व इतर उपस्थित होते.

चव्हाण पुढे म्हणाले, कोरोना आपत्तीनंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. शिक्षणाच्या बदलत्या पद्धतीमुळे विद्यार्थी अस्वस्थ, तर आर्थिक परिस्थितीमुळे पालक अस्वस्थ होते. या परिस्थितीतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.यापुढील काळात भारताच्या उज्वल भविष्यासाठी उत्तम नवी पिढी घडविण्याचा प्रयत्न करावा. ठाणे जिल्ह्याबरोबरच राज्याच्या राजकारणात दिवंगत वसंतराव डावखरे यांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान कायम राहील. त्यांनी कायम हसतखेळत इतरांना आनंद देण्याबरोबरच मैत्रीचे नाते कायम जपले. त्यांचे पहिल्या भेटीपासून निर्माण झालेला जिव्हाळा हजारो नागरिकांच्या मनात आहे, अशा शब्दांत मंत्री चव्हाण यांनी दिवंगत डावखरे यांच्या आठवणी विषद केल्या.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुढील वर्षी पुरस्कार : निरंजन डावखरे

विधान परिषदेचे उपसभापतीपद भूषवितानाच अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ पुरस्काराच्या माध्यमातून कोकणाच्या विविध भागातील शिक्षकांचा गौरव केला जात आहे. संस्थाचालक व शिक्षकांप्रमाणेच अनेक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही उत्तम कार्य केले आहे. पुढील वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार दिले जातील, अशी घोषणा आमदार व समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :thaneठाणेNiranjan Davkhareनिरंजन डावखरे