शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:20 IST

कल्याण-डोंबिवली : खड्ड्यांमध्ये साचले पाणी; बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पडलेल्या सरींमुळे रस्ते ओले झाले, तर काही ठिकाणी पाणी जमा झाले. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नोकरदारांची पंचाईत झाली.  

शहर व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा काहीसा वाढला होता. टिटवाळा शहर व ग्रामीण भागांत गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीत अवकाळी सरी बरसल्या. पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजी, फळेविक्री न झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यानंतर पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी दिवसभर वातावरण ढगाळ होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ नंतर काहीसी वर्दळ झाली. मात्र, त्या तुलनेने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. सकाळी पावसामुळे अनेकांनी रिक्षेने प्रवास करणे पसंत केले.

दरम्यान, शहरात पाण्यामुळे चिखल झाला झाला होता. डांबरी रस्त्यांवर, तसेच खड्यांत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती. तर, वाहनांवर साचलेली धूळ व त्यावर पडलेल्या पावसामुळे वाहने खराब झाली होती. रेल्वे, बस सेवेवर पावसाचा काही परिणाम झाला नव्हता. सर्वत्र सुरळीत वाहतूक सुरू होती. शहरात वीजपुरवठाही सुरळीत सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस भातसानगर : अवकाळी पावसाने गुरुवारी शहापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढग दाटून आले, तसेच जोरदार वारा आणि पावसाने सगळ्यांची झोपच उडाली. कोरोना, अवकाळी पावामुळे गेलेली भातपीक, बर्ड फ्ल्यू, आता दोन चार दिवसांनी पडणारे ढगाळ हवामान आणि पाऊस, यामुळे तर शेतकरी, व्यावसायिक हताश झाले आहेत. आवरे, कांबारे, साजिवली, बिरवाडी, कुकांबे, शहापूरसह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.  

उल्हासनगरात रिमझिम सरीउल्हासनगर : शहरात शुक्रवारी सकाळी रिमझिम सरी कोसळल्या. पावसाने रस्ते निसरडे झाले. पाऊस असल्याने बहुतांश नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळले. सकाळी १०च्या दरम्यान दाट धुके पडले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.वीटभट्टी व्यावसायिकांना फटका लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने भेंडी, काकडीसह तुरीच्या लागवडीला फटका बसला आहे. वीट व्यावसायिकांच्या कच्च्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे.आणखी दोन ते चार दिवस असेच वातावरण राहिले तर वीट उद्योगासोबत काकडी, भेंडी, मिरचीसारखी नगदी पिके पूर्णत: वाया जाणार आहेत. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर दुबार पिके घेण्याकडे वळला आहे. भातपिकाची काढणी झाली की काकडी, भेंडी, सिमला ही जास्तीचा फायदा मिळवून देणारी उत्पादने घेतली जातात. सोबत अनेक शेतकरी भातशेतीच्या बांधावर तुरीची लागवड करू लागलेत. तसेच वीट व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काकडी, भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.