शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

‘अवकाळी’ सरींमुळे नोकरदारांची त्रेधातिरपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:20 IST

कल्याण-डोंबिवली : खड्ड्यांमध्ये साचले पाणी; बाजारपेठेत शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार पडलेल्या सरींमुळे रस्ते ओले झाले, तर काही ठिकाणी पाणी जमा झाले. अचानक आलेल्या पावसामुळे सकाळच्या वेळेत कामावर निघालेल्या नोकरदारांची पंचाईत झाली.  

शहर व ग्रामीण भागात दोन दिवसांपासून हवामान ढगाळ होते. त्यामुळे वातावरणातील उष्मा काहीसा वाढला होता. टिटवाळा शहर व ग्रामीण भागांत गुरुवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला होता. त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीत अवकाळी सरी बरसल्या. पावसामुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजी, फळेविक्री न झाल्याने व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. त्यानंतर पावसाने दिवसभर विश्रांती घेतली असली तरी दिवसभर वातावरण ढगाळ होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ नंतर काहीसी वर्दळ झाली. मात्र, त्या तुलनेने भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. सकाळी पावसामुळे अनेकांनी रिक्षेने प्रवास करणे पसंत केले.

दरम्यान, शहरात पाण्यामुळे चिखल झाला झाला होता. डांबरी रस्त्यांवर, तसेच खड्यांत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय झाली होती. तर, वाहनांवर साचलेली धूळ व त्यावर पडलेल्या पावसामुळे वाहने खराब झाली होती. रेल्वे, बस सेवेवर पावसाचा काही परिणाम झाला नव्हता. सर्वत्र सुरळीत वाहतूक सुरू होती. शहरात वीजपुरवठाही सुरळीत सुरू असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

शहापूर तालुक्यात अवकाळी पाऊस भातसानगर : अवकाळी पावसाने गुरुवारी शहापूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानक ढग दाटून आले, तसेच जोरदार वारा आणि पावसाने सगळ्यांची झोपच उडाली. कोरोना, अवकाळी पावामुळे गेलेली भातपीक, बर्ड फ्ल्यू, आता दोन चार दिवसांनी पडणारे ढगाळ हवामान आणि पाऊस, यामुळे तर शेतकरी, व्यावसायिक हताश झाले आहेत. आवरे, कांबारे, साजिवली, बिरवाडी, कुकांबे, शहापूरसह अनेक भागांत जोरदार पाऊस झाला.  

उल्हासनगरात रिमझिम सरीउल्हासनगर : शहरात शुक्रवारी सकाळी रिमझिम सरी कोसळल्या. पावसाने रस्ते निसरडे झाले. पाऊस असल्याने बहुतांश नागरिकांनी मॉर्निंग वॉकला जाण्याचे टाळले. सकाळी १०च्या दरम्यान दाट धुके पडले. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.वीटभट्टी व्यावसायिकांना फटका लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस झाल्याने भेंडी, काकडीसह तुरीच्या लागवडीला फटका बसला आहे. वीट व्यावसायिकांच्या कच्च्या विटा भिजून मोठे नुकसान झाले आहे.आणखी दोन ते चार दिवस असेच वातावरण राहिले तर वीट उद्योगासोबत काकडी, भेंडी, मिरचीसारखी नगदी पिके पूर्णत: वाया जाणार आहेत. तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर दुबार पिके घेण्याकडे वळला आहे. भातपिकाची काढणी झाली की काकडी, भेंडी, सिमला ही जास्तीचा फायदा मिळवून देणारी उत्पादने घेतली जातात. सोबत अनेक शेतकरी भातशेतीच्या बांधावर तुरीची लागवड करू लागलेत. तसेच वीट व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण असतानाच गुरुवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. काकडी, भेंडीवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.