शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

छोट्या दागिन्यांवर भर; मंदीने सराफ बाजार झाकोळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:45 IST

मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : गेल्या सात वर्षांमधील सोन्याच्या दरांतील उच्चांक यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर गाठला असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाला सोने खरेदीची परंपरा टिकवायची म्हणून छोटे अलंकार किंवा सोन्याची कमी वजनाची वळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे दरवर्षीसारखी हजारो कोटी रुपयांची उलाढाल राज्यात झाली नसल्याचे महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाने सांगितले.मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता. देशातील आर्थिक मंदीचा फटका देशभरातील एक कोटी सुवर्ण कारागिरांना बसला असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. दसºयानिमित्त असमाधानकारक व्यवसाय झाल्याने देशामधील सहा लाख सराफांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आयात शुल्क वाढवण्यात आल्याने आयात घटली आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून त्याची झळ खरेदीदाराला बसते आहे.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे माजी रिजनल अध्यक्ष तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाचे सल्लागार नितीन कदम (ठाणे) यांनी ही खंत ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ते म्हणाले, सोन्याच्या भाववाढीने उच्चांक गाठल्याचा फटका जसा ग्राहकाला बसतो आहे तसा तो सराफ व्यावसायिकांनाही बसतो आहे. देशात सुमारे तीन कोटी सुवर्ण कारागीर होते. सोन्याच्या प्रचंड दरवाढीमुळे ग्राहक नसल्याने आणि सोन्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याने त्यापैकी सुमारे एक कोटी कारागिरांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पश्चिम बंगाल, कारवार तसेच महाराष्ट्र आदी भागांमधील कारागिरांना मोठा फटका बसला आहे. एखादा दागिना घडवण्यासाठी साधारणपणे पंधरा प्रकारच्या विविध पद्धतींनी त्यावर कलाकुसर केली जाते. दागिना घडवण्याच्या कलाकुसरीसाठी प्रत्येक कारागिराचे कौशल्य असते, तीच त्यांची ओळख असते. त्यामुळे केंद्र सरकारने कोट्यवधी कारागिरांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या उपासमारीच्या संकटाची वेळीच गंभीर नोंद घ्यायला हवी. सराफ व्यवसाय तेजीत आणण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत. आमच्या विविध संस्थांची वर्षानुवर्षांची ही मागणी आहे, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने या व्यवसायातील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये फारसे यश येत नसल्याने अनेक व्यापारी जोड व्यवसायांकडे वळत आहेत. सराफ व्यावसायिकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा सन्मानाचा होता. पण आता व्यवसायच नसल्याने दिवसेंदिवस सराफ व्यापारी नैराश्येत गेले आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये साधारणपणे ७ टक्के योगदान हे सराफ बाजाराचे असते. त्यामुळे या व्यवसायाकडे कानाडोळा करून चालणार नाही, असेही कदम म्हणाले.पॅकेज देण्याची गरजबँका गोल्ड लोन देत नाहीत, ही समस्या आहे. तसेच केंद्र सरकारकडून या उद्योगाला अन्य उद्योगांप्रमाणे तग धरण्यासाठी पॅकेज दिले जाण्याची गरज आहे. दसºयाला ग्राहकांनी वळे, चेन, कानातले, छोटी मंगळसूत्रे, अंगठ्या अशा छोट्या दागिन्यांची खरेदी करून केवळ मुहूर्त साधला, असे निरीक्षण नितीन कदम यांनी नोंदवले.

टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय