शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणांच्या ताब्यात महाबाेधी विहारमुक्तीसाठी ठाण्यात एल्गार!

By सुरेश लोखंडे | Updated: March 25, 2025 16:59 IST

‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी होते.

ठाणे  - बोधगया येथील ब्राह्मणाच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत शिव फुले शाहू आणि आंबेडकर अनुयायांनी मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्याडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

नियोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेला हा माेर्चा जांभळी नाका येथून काेर्टनाक्यावर थांबवण्यात आला. बिहार राज्यातील पाटना बोधगया येथील महाबोधी विहारात गेले अनेक वर्षांपासून ब्राह्मण व्यवस्थापन आहे. ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले हे महाबोधी विहार मुक्त करून ते बौध्दांच्या ताब्यात द्यावे, यासाठी देशभर भिक्खूसंघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलने सुरु आहेत. त्याच्या पाठिंब्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला. ‘बुध्दम शरणम गच्छामी’ अशा सुरात जांभळी नाका येथून सकाळी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात दोन ते तीन हजार लोक सहभागी होते.

मोर्चा समितीच्या वतीने भदंत लामा यांच्या नेतृत्वाखालील भिक्खूसंघ, नानासाहेब इंदिसे,भास्कर वाघमारे राजाभाऊ चव्हाण आदींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यां जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. बोधगया महाबोधी विहार १९४९ चा कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा; बोध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन, भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात द्यावे. बोधगया येथे उपोषण करीत असलेल्या बौद्ध भिक्खूंवर होणारा पोलिसी अत्याचार त्वरीत थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासारख्या मागण्या मोर्चात करण्यात आल्या.