शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
4
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
5
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
6
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
7
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
8
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
11
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
12
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

निवडणुकीत भाजपाची पीछेहाट, राष्ट्रवादी शिवसेनेची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 5:58 AM

ग्रामपंचायत निवडणुकीत मुरबाड तालुक्यातील १३ पैकी केवळ ४ ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सरशी होऊन सरपंचपदाच्या ९ जागा त्यांना मिळाल्या.

मुरबाड : ग्रामपंचायत निवडणुकीत मुरबाड तालुक्यातील १३ पैकी केवळ ४ ठिकाणी भाजपाचे सरपंच निवडून आले. तर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सरशी होऊन सरपंचपदाच्या ९ जागा त्यांना मिळाल्या. या निवडणुकीत काही ठिकाणी जुनी भाजपा विरूध्द नवी भाजपा अशी लढत झाल्याचेही दिसून आले.तालुक्यातील १३ पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ऊर्वरित १० ग्रा.पं.साठी सोमवारी मतदान झाले. मंगळवारी त्याची मतमोजणी तहसील कार्यालयात झाली. या वेळी कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.१३ ग्रामपंचायतींपैकी माळ, आसोळे, कान्होळ, खोपिवली, भादाणे, साकुर्ली, तोंडली, आंबेळे (बु.) आणि किशोर येथे राष्टÑवादी - सेना युतीचे सरपंच विजयी झाले. तर वैशाखरे, सासणे, डोंगरन्हावे, मोहघर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपाकडे गेले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टÑवादीच्या युतीची सरशी झाल्याने लवकरच होऊ घातलेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीतील विजयाची ही मुहूर्तमेढ असल्याची चर्चा आहे. विजयी सरपंच तसेच सदस्यांचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुभाष पवार यांनी स्वागत केले. निवडून आलेल्या सदस्यांनी महिन्याभरात निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांचे पद धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार सचिन चौधर यांनी सांगितले.राष्टÑवादी - सेना आणि भाजपाचे नवे सरपंचसरपंचपदी निवडून आलेले (१) प्रवीण कोर (आसोळे), (२) गीता पवार (आंबेळे), (३) लक्ष्मीबाई शिद (माळ) (४) मनीषा देसले (कान्होळ), (५) जानु गायकर (किशोर), (६) दशरथ शेलवले (भादाणे), (७) सुषमा पडवळ, (तोंडली), (८) प्रतिभा रांजणे, साकुर्ली, (९) चांगुणा वाघ, (खोपिवली) हे युतीचे तर (१) बुधाजी पारधी (वेैशाखरे), (२) रुपाली शेळके (डोंगरन्हावे) (३) गणेश भोईर (सासणे) आणि मोहघर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद भाजपाकडे गेले.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक