शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

इलेक्शन आठवणी: महाजन यांचे नियोजन अन मुंडेंचे परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:51 IST

रामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

-जगन्नाथ पाटीलरामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यांच्यासारखे काम कोण करणार, असा सवाल सर्वच नेत्यांसमोर होता. त्यावेळी वसंतराव भागवत यांनी माझे नाव पुढे केले आणि क्षणार्धात निर्णय झाला. त्यावेळी सगळ्यांमध्ये वयाने मी लहान होतो.युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन होते, तर गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. महाजन यांच्याबद्दल आदर, प्रेम, आपुलकी नक्कीच होती आणि आहे. पण, तरीही मुंडेच जास्त प्रिय होते. १९८२ मध्ये मी ठाणे लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा मतदारसंघ मोठा असल्याने प्रचंड प्रवास करावा लागत होता. दळणवळणासाठी साधनसामग्रीची वानवा होती. आजच्यासारखे ना मोबाइल, ना इंटरनेट सुविधा. दहाबारा गावांमध्ये एखाद्याच घरात दूरध्वनी असला तर असायचा. पण, कार्यकर्ते एकनिष्ठ होते आणि जीवाला जीव देणारी मंडळी होती. त्या निवडणुकीत मुरबाड तालुक्याची जबाबदारी स्व. मुंडे यांच्याकडे होती.स्वत:ची जीप घेऊन ते आले होते. महिनाभर त्यांनी तालुका पिंजून काढला होता. दुपारच्या जेवणाची ज्या गावपाड्यात असेल, तिथे सोय झाली तर झाली, नाही तर ठीक. पण, रात्रीचा मुक्काम मात्र मुरबाडमध्ये शहा यांच्याकडे होता. पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी पडेल ते काम त्यांनी केल्याचे मी जवळून पाहिले. महाजन हे निवडणुकीचे नियोजन अत्यंत चोख करायचे. महाजन यांचे नियोजन, मुंडे यांची मेहनत व कार्यकर्त्यांची साथ यामुळे मी १९८२ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलो. काँग्रेसचे प्रभाकर हेगडे, समाजवादी पक्षाचे दत्ताजी ताम्हाणे, शिवसेनेचे सतीश प्रधान यांना मी पराभूत केले होते. स्व. म्हाळगी यांच्या पत्नीने पुण्याहून येऊन माझ्यासाठी प्रचार केला होता. १९८४ मध्ये मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशातील वातावरण बदलले, मी निवडणूक हरलो. त्यावेळी स्व. शांताराम घोलप हे निवडून आले होेते.लोकसभेच्या दोन निवडणुका लढलो, पण पैसे नेमके किती खर्च झाले, हे माहीत नाही. पक्षाने खर्च केला. मला जो निधी दिला जायचा, तो दर सोमवारच्या आढावा बैठकीत मांडला जायचा. प्रत्येकाचे हिशेबाचे कागद गोळा केले जायचे. इतकी पारदर्शकता होती. आता निवडणुकीची समीकरणे फार बदलली आहेत. २००९ नंतरच्या निवडणुकांमध्ये ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी, अशी अवस्था आहे.(माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते)- शब्दांकन : अनिकेत घमंडी

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा