शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

इलेक्शन आठवणी: महाजन यांचे नियोजन अन मुंडेंचे परिश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:51 IST

रामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.

-जगन्नाथ पाटीलरामभाऊ म्हाळगींच्या निधनामुळे रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेकरिता सक्षम उमेदवार नसल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यांच्यासारखे काम कोण करणार, असा सवाल सर्वच नेत्यांसमोर होता. त्यावेळी वसंतराव भागवत यांनी माझे नाव पुढे केले आणि क्षणार्धात निर्णय झाला. त्यावेळी सगळ्यांमध्ये वयाने मी लहान होतो.युतीचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन होते, तर गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. महाजन यांच्याबद्दल आदर, प्रेम, आपुलकी नक्कीच होती आणि आहे. पण, तरीही मुंडेच जास्त प्रिय होते. १९८२ मध्ये मी ठाणे लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा मतदारसंघ मोठा असल्याने प्रचंड प्रवास करावा लागत होता. दळणवळणासाठी साधनसामग्रीची वानवा होती. आजच्यासारखे ना मोबाइल, ना इंटरनेट सुविधा. दहाबारा गावांमध्ये एखाद्याच घरात दूरध्वनी असला तर असायचा. पण, कार्यकर्ते एकनिष्ठ होते आणि जीवाला जीव देणारी मंडळी होती. त्या निवडणुकीत मुरबाड तालुक्याची जबाबदारी स्व. मुंडे यांच्याकडे होती.स्वत:ची जीप घेऊन ते आले होते. महिनाभर त्यांनी तालुका पिंजून काढला होता. दुपारच्या जेवणाची ज्या गावपाड्यात असेल, तिथे सोय झाली तर झाली, नाही तर ठीक. पण, रात्रीचा मुक्काम मात्र मुरबाडमध्ये शहा यांच्याकडे होता. पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी पडेल ते काम त्यांनी केल्याचे मी जवळून पाहिले. महाजन हे निवडणुकीचे नियोजन अत्यंत चोख करायचे. महाजन यांचे नियोजन, मुंडे यांची मेहनत व कार्यकर्त्यांची साथ यामुळे मी १९८२ मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलो. काँग्रेसचे प्रभाकर हेगडे, समाजवादी पक्षाचे दत्ताजी ताम्हाणे, शिवसेनेचे सतीश प्रधान यांना मी पराभूत केले होते. स्व. म्हाळगी यांच्या पत्नीने पुण्याहून येऊन माझ्यासाठी प्रचार केला होता. १९८४ मध्ये मात्र स्व. इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे देशातील वातावरण बदलले, मी निवडणूक हरलो. त्यावेळी स्व. शांताराम घोलप हे निवडून आले होेते.लोकसभेच्या दोन निवडणुका लढलो, पण पैसे नेमके किती खर्च झाले, हे माहीत नाही. पक्षाने खर्च केला. मला जो निधी दिला जायचा, तो दर सोमवारच्या आढावा बैठकीत मांडला जायचा. प्रत्येकाचे हिशेबाचे कागद गोळा केले जायचे. इतकी पारदर्शकता होती. आता निवडणुकीची समीकरणे फार बदलली आहेत. २००९ नंतरच्या निवडणुकांमध्ये ज्याच्या हाती सत्ता तोच पारधी, अशी अवस्था आहे.(माजी मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते)- शब्दांकन : अनिकेत घमंडी

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा