शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 6:33 PM

 काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देभादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयारआतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्णआजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली. त्याप्रसंगी ते बोलत होते     काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.         मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यांवर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबाचा उदरिनर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्यांच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद