शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरी तोफ धडाडणार; उद्धव टेंभी नाक्यावर सभा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 16:50 IST

शिवसेनेच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ठाण्यातून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे

अजित मांडके 

ठाणे : उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे. त्यात ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिल्याने आता ठाण्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या ठाण्यात येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातही त्यांची ही सभा दिघे यांच्या टेंभी नाक्यावर घेण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे आता या सभेकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिली सत्ता ही ठाण्यानेच दिली होती. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. याच ठाण्याने शिवसेनेला मागील २५ वर्षे निर्विवाध सत्ता दिली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेत दोन गट झाल्याने जवळ जवळ ९० टक्के शिवसैनिक आणि महत्वाचे पदाधिकारी, ६७ पैकी ६६ लोकप्रतिनिधी हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी ठाण्यात शिंदे गटाचा वरचष्मा दिसत आहे. दुसरीकडे आता उध्दव ठाकरे गटही मागील काही दिवसापासून आक्रमक झाला असून नुकत्याच झालेल्या दहीहांडी उत्सवात देखील हे दोनही गट बॅनरबाजीतून एकमेकासमोंर आले असल्याचे दिसून आले. त्यात ठाकरे गटाकडून आता पुन्हा जुन्या शिवसैनिकांना नवसंजवनी देण्याचे काम केले जात असून त्यांच्या खांद्यावर महत्वाच्या जबाबदा:या देखील सोपविण्यात आल्या आहेत.

त्यातही टेंभी नाक्याला शिवसेनेच्या दृष्टीकोणातून खुप महत्वाचे स्थान आहे. याच टेंभी नाक्यावर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या माध्यमातून नवरात्रो उत्सव साजरा केला जात होता, तो आजही साजरा होत आहे. तर याच टेंभीनाक्यावरुन दिघे यांनी दहीहांडी उत्सवास सुरवात करुन तो साता समुद्रापार गेला होता. याच भागात आनंद आश्रम आणि शिवसेनेचे निवडणुक कार्यालय देखील आहे. त्यामुळे या टेंभी नाक्याला अनन्य साधारण महत्व आहे. परंतु नुकत्याच झालेल्या दहीहांडी उत्सवात येथेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे यांना साद घालत आगामी निवडणुकीची डरकाळी देखील फोडली आहे. परंतु आता याच टेंभी नाक्यावर येत्या काही दिवसात बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची डरकाळी कानावर पडणार आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ठाण्यातून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. त्यातही ही सभा टेंभी नाक्यावर घेण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहे. त्याचे कारणही तसेच आहे, टेंभी नाक्याची ओळख दिघे यांच्या नावानेच होत आहे. आजही दिघे यांच्या नावाला ठाणोकर खुप महत्व देत आहेत. त्यामुळे आता याच टेंभी नाक्यावर सभा घेऊन दिघे कार्ड वापरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे