शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लॉकडाऊनच्या १८ दिवसांत आठ हजार ८७८ चाचण्या;मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रामध्ये दोन हजार ५५५ रुग्ण बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:23 IST

मीरा-भार्इंदरमध्ये मार्चअखेरपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली.

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये ३० जूनपर्यंतच्या मागील तीन महिन्यांत कोरोना चाचण्यांची संख्या १० हजार ४२३ आणि कोरोना रुग्णांची बरे होण्याची संख्या दोन हजार ३६४ इतकी होती. परंतु, लॉकडाऊनच्या जुलैच्या अवघ्या १८ दिवसांच्या कालावधीत तब्बल आठ हजार ८७८ चाचण्या करून दोन हजार ५५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोना चाचण्या व रुग्ण बरे होण्याचे १८ दिवसांतील प्रमाण हे दिलासादायक आहे. पण, त्याचबरोबर या १८ दिवसांत तीन हजार ९६ नवे रुग्ण सापडले, तर ७४ जणांचा मृत्यू झाला.

मीरा-भार्इंदरमध्ये मार्चअखेरपासून कोरोनाचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. १८ जुलैपर्यंत पालिकेने १९ हजार २०१ इतक्या कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. यातील जवळपास निम्म्या आठ हजार ८७८ चाचण्या अवघ्या १ ते १८ जुलै या कालावधीत केल्या आहेत. १८ जुलैपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या सहा हजार ४२२ तर यातून बरे झालेल्यांची संख्या चार हजार ९१९ इतकी आहे. कोरोनाने आतापर्यंत शहरात २१९ जणांचा बळी घेतला आहे. नव्याने नियुक्त केलेले आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी पदभार स्वीकारल्यापासून सर्वेक्षण, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यासह रुग्णांच्या उपचारावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

मागील तीन महिन्यांत बरे होणारे रुग्ण दोन हजार ३६४ होते. परंतु, जुलैच्या १८ दिवसांत दोन हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. परंतु, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. तीन महिन्यांत १४५ रुग्णांचे मृत्यू झाले तर गेल्या १८ दिवसांत ७४ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्याही १८ दिवसांत दुप्पट झाली आहे. तीन महिन्यांत कोरोनाचे तीन हजार ३२६ रुग्ण होते. परंतु, १८ दिवसांतच तीन हजार ९६ रुग्ण सापडले आहेत. चाचण्या वाढल्या आणि चेस द व्हायरस या मुंबईच्या धर्तीवर राबवलेल्या मोहिमेमुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे पालिकेच्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

प्रशासनाचे मोठे यश

च्याआधी दोन्ही शहरांत इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या, सर्वेक्षण झाले नव्हते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात चाचण्या वाढवल्याने नेमके रुग्ण शोधण्यात पालिका प्रशासनाला मोठे यश आले. इतके दिवस रुग्णांचा शोध घेता येत नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर