शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

पर्यटनाच्या माध्यमातून जव्हारच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा प्रयत्न - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 20:37 IST

पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठाणे/पालघर, दि. 01 - पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. जव्हार नगर परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त ते बोलत होते. चांगले रस्ते जव्हार शहराच्या पर्यटनाला चालना देऊ शकतील त्यामुळे जव्हारच्या भवती चांगल्या रस्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सावरा, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चिंतामण वनगा, आमदार पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते.  पालघर-जव्हार-सिन्नर या राष्ट्रीय महामार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून डहाणू-जव्हार-मोखाडा-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्याचा कॅबिनेट मंत्री या नात्याने पाठपुरावा करणार असल्याची ग्वाहीही एकनाथ  शिंदे यांनी यावेळी दिली. सध्या प्रस्तावित असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला हे राष्ट्रीय महामार्ग जोडल्यास जव्हारच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी जव्हारवासीयांना दिले. रस्त्याचे भक्कम जाळे या ठिकाणी उभारल्यास देश विदेशातील पर्यटकांना जव्हारला पोहोचणं अधिक सोयीचं होईल आणि जागतिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जव्हारची पाणीपुरवठा योजना जुनी झाली असून वाढत्या लोकसंख्येबरोबर ही योजना अपग्रेड करण्याची गरज आहे. यासाठी जव्हारजवळील खडखड प्रकल्पातून अतिरिक्त पाणी योजनेला मंजुरी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, विकासासाठी आग्रही असलेले विष्णू सावरा यांच्यासारखे मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या जिल्ह्याचे आणि विशेष करून जव्हारच्या विकासाचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे