शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
2
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
3
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
4
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
5
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
6
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
7
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
8
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
9
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
10
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
11
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
12
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
13
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
14
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
15
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
16
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
17
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
18
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
19
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

सरनाईकांकरिता ईडी तारक की मारक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 00:36 IST

सेना करणार पाठराखण : कंगना, अर्णब प्रकरणात घेतलेली आक्रमक भूमिका

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही दिवसांत अभिनेत्री कंगना रानौत व पत्रकार अर्णब गोस्वामी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीकास्त्र सोडणाऱ्या दोघांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मंत्रिपदाने हुलकावणी दिल्यावर पक्षाने सोपविलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी सरनाईक यांनी तडफेने पार पाडली. लागलीच ईडीचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला. आता या लढाईत सरनाईक यांची शिवसेना नेतृत्व पाठराखण करणार का? व सरनाईक यांना त्यांच्या लढवय्या पवित्र्याची राजकीय बक्षिशी मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद प्राप्त झाले. तीन टर्म आमदार होऊनही एकाच जिल्ह्यात किती मंत्रिपदे द्यायची, या निकषामुळे सरनाईक यांची संधी हुकली. शिवसेनेने त्यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली. कंगना रानौत हिने उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केल्यावर तिच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक व्हावी, याकरिता सरनाईक यांनी पाठपुरावा केला. गोस्वामी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. मीरा-भाईंदर हा ठाणे जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला होता. नरेंद्र मेहता यांच्यासारखे मातब्बर आमदार तेथे भाजपचे प्रतिनिधित्व करीत होते. भाजपच्या गीता जैन यांनी मेहता यांना मात दिली. अपक्ष विजयी झालेल्या जैन यांनी शिवसेनेत प्रवेश करावा याकरिता सरनाईक यांनी प्रयत्न केले व त्यांना सेनेत आणून मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना मजबूत केली. सरनाईक यांचे हे आक्रमक होणे यामागे जिल्ह्यातील दोन मातब्बर मंत्र्यांच्या प्रभावात आपले राजकीय अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांचे विश्वासू सहकारी राहिलेल्या सरनाईक यांचे गेली काही वर्षे त्यांच्याशी राजकीय वैर निर्माण झाले होते. मात्र म्हाडाच्या वर्तकनगर येथील घरांच्या प्रकल्पाच्या निमित्ताने सरनाईक यांनी आव्हाड यांच्याशी असलेले जुने वैर संपुष्टात आणले. यामुळे सरनाईक यांची राजकीय घोडदौड गेल्या काही महिन्यांत चर्चेत होती.

ओवळा-माजिवडा हा सरनाईक यांचा मतदारसंघ मीरा-भाईंदरला खेटून असल्याने व मीरा-भाईंदरमधील भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचा भाजप सरकारच्या काळात दबदबा असल्याने सरनाईक व मेहता यांच्या परस्परपूरक राजकारणाची राजकीय वर्तुळात चर्चा असायची. मेहता यांचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी घनिष्ट संबंध होते. राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास ठाण्यात शिवसेनेचा एक बडा नेता भाजप गळाला लावणार, अशी चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुरू होती. प्रत्यक्षात उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी भाजपचे मनसुबे उधळून लावले. सत्ता जाताच मीरा-भाईंदरमध्ये मेहता यांचेही ग्रह फिरले व सरनाईक यांनी मुसंडी मारली. त्यामुळे ईडीची कारवाई ही सेनेचे नेते आरोप करतात तशी राजकीय हेतूने केलेली असण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.

ठाण्यातील नेत्यांची चुप्पीसरनाईक यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक पोहोचल्यानंतर खा. संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दांत केंद्र सरकारचा समाचार घेतला. मात्र शिवसेनेचे सर्वोच्च नेते तसेच ठाण्यातील प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सरनाईक यांची शिवसेना आता कशी पाठराखण करणार व कारवाई राजकीय हेतूने असल्यास त्यांना ती राजकारणात फलदायी ठरणार का, याची शिवसैनिकांत उत्सुकता आहे.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकthaneठाणे