शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

भिवंडीत फटाक्यांच्या प्रदूषणापेक्षाही धुळीचे प्रदूषण जास्त, नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: October 20, 2022 15:49 IST

रस्त्यावरील धुळीने प्रवाशांसह वाहतूक पोलीस हैराण

भिवंडी -  दिवाळी सणा निमित्त वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची ओरड दरवर्षी होत असते. मात्र दिवाळीच्या फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरापेक्षाही अधिक प्रदूषण सध्या शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे होत असल्याचे चित्र सध्या भिवंडीत पाहायला मिळत आहे. या धुळीमुळे वाहन चालकांबरोबरच प्रवासी व वाहतूक पोलिसांना या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.          भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून शहराच्या बाजूला असलेल्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची देखील खाड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून प्रचंड धूळ उडत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्ड्यांमध्ये धुळीचा त्रास शहरात व टोल रस्त्यांवर वाढला आहे. ज्याचा नाहक त्रास वाहन चालकांबरोबरच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनाही होत आहे.           भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा मानकोली रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले असून खारबाव व अंजुरफाटा येथे धुळीने नागरिक हैराण झाले आहेत.तर भिवंडी कशेळी रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने देखील नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व नागरिकांची या धुळीपासून मुक्तता करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र मनपा प्रशासनासह संबंधित टोल कंपन्या देखील त्याकडे दुर्लक्ष करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ही त्याकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण