शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडीत फटाक्यांच्या प्रदूषणापेक्षाही धुळीचे प्रदूषण जास्त, नागरिक हैराण

By नितीन पंडित | Updated: October 20, 2022 15:49 IST

रस्त्यावरील धुळीने प्रवाशांसह वाहतूक पोलीस हैराण

भिवंडी -  दिवाळी सणा निमित्त वाजवण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची ओरड दरवर्षी होत असते. मात्र दिवाळीच्या फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरापेक्षाही अधिक प्रदूषण सध्या शहरातील अंतर्गत व मुख्य रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे होत असल्याचे चित्र सध्या भिवंडीत पाहायला मिळत आहे. या धुळीमुळे वाहन चालकांबरोबरच प्रवासी व वाहतूक पोलिसांना या धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.          भिवंडी शहरातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून शहराच्या बाजूला असलेल्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांची देखील खाड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून प्रचंड धूळ उडत आहे. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे खड्ड्यांमध्ये धुळीचा त्रास शहरात व टोल रस्त्यांवर वाढला आहे. ज्याचा नाहक त्रास वाहन चालकांबरोबरच वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांनाही होत आहे.           भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा मानकोली रस्त्याची दुरावस्था झाल्याने या रस्त्यावर अनेक ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले असून खारबाव व अंजुरफाटा येथे धुळीने नागरिक हैराण झाले आहेत.तर भिवंडी कशेळी रस्त्यावर उडणाऱ्या धुळीने देखील नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी व नागरिकांची या धुळीपासून मुक्तता करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र मनपा प्रशासनासह संबंधित टोल कंपन्या देखील त्याकडे दुर्लक्ष करत असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ही त्याकडे पुरता दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण