शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

दसरा महागला! फुल बाजार ‘सोन्या’ ने सजले; पावसामुळे फुलांची आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 15:48 IST

Kalyan market: कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे. 

कल्याण :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्ताने फूल बाजारात नागरिक जमत आहेत. कल्याणनगरीतील फुल बाजार आपट्याच्या पानांनी (सोन्याने) सजले आहे. फुलबाजार रंगबेरंगी फुले आणि हिरव्या पानांनी बहरल्याचे दिसून आले. कोरोना काळ आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थितीमुळे आवक कमी असून किमती वाढल्या आहेत,  तरीही खरेदी-विक्री सुरू असून बाजारात एक कोटींची उलाढाल झाली. 

बाजारात कापरी, पिवळा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची खरेदी-विक्री  होत होती. १०० ते १५० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती ३०० रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. वेणी, गजरा बनविण्यासाठी मोगरा, जाई, जुई फुले खरेदी केली जात आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार ४० ते ६० रुपये, तोरण ३० ते ५० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा ५ ते १० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबाजी पोखरकर यांनी सांगितले की, पावसामुळे फुलांची आवक कमी झाली आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांच्या एक हजार गाड्या येतात. मात्र यंदा ५०० गाड्या आल्या आहेत. त्यामुळे ५० टक्के फुलांची आवक कमी झाली आहे. 

घाऊक फुल व्यापारी भाऊ नरवडे यांनी सांगितले की, फुलांची आवक पुणे, अहमदनगर, नाशिक, उस्मानाबाद येथून झाली आहे. फुलांचे दर चढत-उतरत आहेत. शनिवारी, १०० ते १५० रुपये या दराने फुलांची विक्री होत आहे. गुलछडी ४०० रुपये किलो, अस्टर २५० किलो, कापरी १५० किलो, मोगरा ८०० ते एक हजार रुपये किलो, गुलाब २०० रुपये जुडी आहे. सध्या बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल सुरू झाली. परंतु, ही उलाढाल मागीलवर्षी दीड ते दोन कोटींची होती. आपट्याच्या पानांना सोनेरी रंग देऊन त्यांना योग्यरित्या पॅकिंग करुन ‘२४ कॅरेट सोने’ म्हणून एक आपट्याचे पान ५ ते १० रुपयांना विकले जात होते. आपट्याची पाने कसारा, आसनगाव, मुरबाड, शहापूर या ठिकाणच्या जंगलाच्या भागातून आणली जात आहेत. आपट्याची पाने २० ते ३० रुपये जुडीप्रमाणे विकली जात आहेत, असे विक्रेत्यानी सांगितले.

टॅग्स :Dasaraदसरा