शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद होणार

By admin | Updated: February 23, 2016 02:22 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मागवलेल्या निविदेला सोमवारी पार पडलेल्या

कल्याण : न्यायालयाच्या आदेशानुसार आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मागवलेल्या निविदेला सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ही प्रक्रिया कंत्राटदारामार्फत सुरू होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाविषयी उच्च न्यायालयात कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात याचिका न्यायप्रविष्ट आहे. २८ कोटी ४१ लाख रुपये किमतीची ही निविदा अग्रवाल सोल्युशन व कृषी रसायन या दोन कंपन्यांनी भरली होती. तिला स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी मंजुरी दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचे क्षेत्रफळ ५.८८ हेक्टर इतके आहे. सध्या डम्पिंग ग्राउंडवर १५.३० लक्ष घनमीटर कचरा साचलेला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने तो हटवल्यावर रिक्त होणाऱ्या चार हेक्टर जागेचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. तेथे बगीचा व उद्यान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदार कंपनीला अटीशर्ती घालण्यात आलेल्या आहेत. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केल्यावर शास्त्रोक्त भरावभूमी बारावे येथे विकसित करण्याचे कामही अग्रवाल व कृषी या कंपनीलाच दिले गेले. हे काम १९ कोटी १३ लाख रुपये किमतीचे आहे. कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उंबर्डे येथे उभारण्याचे काम अवी प्लॉस्ट या मुंबईच्या कंत्राट कंपनीला दिले आहे. त्याची किंमत दोन कोटी ३० लाख रुपये आहे. त्यात भांडवली व देखभाल दुरुस्तीची रक्कम मिळून हा खर्च दोन कोटी ३० लाख रुपये आहे. त्यालाही आज समितीने मंजुरी दिली.कल्याण पूर्वेतील तिसगाव येथेही १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. पण, दोनच निविदा आल्याने फेरनिविदा मागविल्या जाणार आहेत. उंबर्डे येथे ३०० मेट्रीक टन, बारावे व मांडा येथे प्रत्येकी १५० मेट्रीक घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव आहे. उंबर्डे येथे वेस्ट टू एनर्जीसाठी चार वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे आता केवळ आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून त्या बदल्यात बारावे येथे सुरू करायचे आहे. मांडा येथील जागा पालिकेच्या ताब्यात नाही. पालिका १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबवून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस तयार करणार होती. त्यापैकी एकाच प्रकल्पाला मंजुरी देणे शक्य झाले आहे. बाकीचे थंड बस्त्यात आहेत, असे स्पष्ट झाले.