शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महिन्याभरात ७ वेळा पाणी पुरवठा खंडित झाल्याने मीरा-भाईंदरमध्ये पाणी टंचाई तीव्र 

By धीरज परब | Updated: April 19, 2023 12:56 IST

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्या भरात ७ वेळा विविध कारणांनी खंडित झाल्याने शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर व महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका प्रशासन सांगते. मात्र शहराला पाणी मात्र रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच मिळते . सध्याची लोकसंख्यान विचारात घेतली तर रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे . मागणीच्या तुलनेत रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी शहराला कमी मिळते . शिवाय महानगरपालिकेकडे ह्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य स्तोत्र नाही. 

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होतो. पाण्याचे योग्य नियोजन करुन सद्यस्थितीत शहरास ३६ ते ५० तासांनंतर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे स्टेम व एमआयडीसी पैकी एका संस्थेने शट डाऊन घेतल्यास त्या मध्ये किमान २० दिवसांच्या कालावधीचे अंतर ठेवून शट डाऊन घ्यावा असे दोन्ही संस्थाना पालिकेने कळवले आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली.  

१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ७ वेळा पाणी पुरवठा खंडित 

१५ मार्च रोजी स्टेम ने  जलवाहिनी दुरुस्ती व फ्लो मिटर बसविणेकरीता तर १५ एप्रिल रोजी टेमघर पंपिगची मुख्य जलवाहिनी ब्रेक झाल्यामुळे शट डाऊन घेतला .  एमआयडीसी कडून १६ मार्च रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने, २४ मार्च रोजी बारवी गुरुत्व जलवाहिनी दुरुस्ती साठी , ३१ मार्च रोजी घोडबंदर रोडवर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ८ एप्रिल रोजी  विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने व १५ एप्रिल रोजी बदलापुर समाधान हॉटेल समोर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल उडाल्याने शट डाऊन घेण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी