शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिन्याभरात ७ वेळा पाणी पुरवठा खंडित झाल्याने मीरा-भाईंदरमध्ये पाणी टंचाई तीव्र 

By धीरज परब | Updated: April 19, 2023 12:56 IST

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्या भरात ७ वेळा विविध कारणांनी खंडित झाल्याने शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर व महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका प्रशासन सांगते. मात्र शहराला पाणी मात्र रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच मिळते . सध्याची लोकसंख्यान विचारात घेतली तर रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे . मागणीच्या तुलनेत रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी शहराला कमी मिळते . शिवाय महानगरपालिकेकडे ह्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य स्तोत्र नाही. 

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होतो. पाण्याचे योग्य नियोजन करुन सद्यस्थितीत शहरास ३६ ते ५० तासांनंतर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे स्टेम व एमआयडीसी पैकी एका संस्थेने शट डाऊन घेतल्यास त्या मध्ये किमान २० दिवसांच्या कालावधीचे अंतर ठेवून शट डाऊन घ्यावा असे दोन्ही संस्थाना पालिकेने कळवले आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली.  

१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ७ वेळा पाणी पुरवठा खंडित 

१५ मार्च रोजी स्टेम ने  जलवाहिनी दुरुस्ती व फ्लो मिटर बसविणेकरीता तर १५ एप्रिल रोजी टेमघर पंपिगची मुख्य जलवाहिनी ब्रेक झाल्यामुळे शट डाऊन घेतला .  एमआयडीसी कडून १६ मार्च रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने, २४ मार्च रोजी बारवी गुरुत्व जलवाहिनी दुरुस्ती साठी , ३१ मार्च रोजी घोडबंदर रोडवर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ८ एप्रिल रोजी  विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने व १५ एप्रिल रोजी बदलापुर समाधान हॉटेल समोर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल उडाल्याने शट डाऊन घेण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी