शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

महिन्याभरात ७ वेळा पाणी पुरवठा खंडित झाल्याने मीरा-भाईंदरमध्ये पाणी टंचाई तीव्र 

By धीरज परब | Updated: April 19, 2023 12:56 IST

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. 

मीरारोड - मीरा भाईंदर शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणारा पाणीपुरवठा गेल्या महिन्या भरात ७ वेळा विविध कारणांनी खंडित झाल्याने शहरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. 

मीरा भाईंदर शहराला स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. कडून ८६ दशलक्ष लिटर व महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ कडून १२५ दशलक्ष लिटर असा एकूण २११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा मंजूर असल्याचे महापालिका प्रशासन सांगते. मात्र शहराला पाणी मात्र रोजचे सरासरी १८५ ते १९० दशलक्ष लिटर इतकेच मिळते . सध्याची लोकसंख्यान विचारात घेतली तर रोज २१६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे . मागणीच्या तुलनेत रोज २६ ते ३१ दशलक्ष लिटर पाणी शहराला कमी मिळते . शिवाय महानगरपालिकेकडे ह्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य स्तोत्र नाही. 

शहर दोन्ही पाणी पुरवठा योजने पासून शेवटच्या टोकाला आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा खंडित झाल्यास तो पुर्ववत होईपर्यंत पुढील दोन ते तीन दिवस शहरास पाणी पुरवठा कमी दाबाने व उशीराने होतो. पाण्याचे योग्य नियोजन करुन सद्यस्थितीत शहरास ३६ ते ५० तासांनंतर पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे स्टेम व एमआयडीसी पैकी एका संस्थेने शट डाऊन घेतल्यास त्या मध्ये किमान २० दिवसांच्या कालावधीचे अंतर ठेवून शट डाऊन घ्यावा असे दोन्ही संस्थाना पालिकेने कळवले आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी दिली.  

१५ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ७ वेळा पाणी पुरवठा खंडित 

१५ मार्च रोजी स्टेम ने  जलवाहिनी दुरुस्ती व फ्लो मिटर बसविणेकरीता तर १५ एप्रिल रोजी टेमघर पंपिगची मुख्य जलवाहिनी ब्रेक झाल्यामुळे शट डाऊन घेतला .  एमआयडीसी कडून १६ मार्च रोजी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने, २४ मार्च रोजी बारवी गुरुत्व जलवाहिनी दुरुस्ती साठी , ३१ मार्च रोजी घोडबंदर रोडवर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल अज्ञात वाहनाने धडक दिल्याने, ८ एप्रिल रोजी  विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने व १५ एप्रिल रोजी बदलापुर समाधान हॉटेल समोर मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल उडाल्याने शट डाऊन घेण्यात आलेले आहेत.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकWaterपाणी