शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 31, 2024 15:59 IST

ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे १२०० हुन अधिक वारकऱ्यांनी नावे नोंदवली होती.

ठाणे : प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वेने विशेष, जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी आसूसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी तीन महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वेप्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे १३०० हुन अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावे लागले आहे असा आरोप विलास महाराज फापळे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलींचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे १२०० हुन अधिक वारकऱ्यांनी नावे नोंदवली होती. सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फापळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे ४९ लाखपैकी आगाऊ ९ लाख रुपये भरुन रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती. याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे साडे तीन लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू २२मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक १५ मे रोजी तुमचे आरक्षण रद्द करत असल्याचे रेल्वे प्रशासनाने फापळे यांना कळवले.

रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे फापळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली. त्यावर उत्तरप्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून. याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असे सांगितले. वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार विलासमहाराज फापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि इ मेल द्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली. परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठणयातील वारकऱ्यांना रामल्लाच्या दर्शनाला मुकावे लागल्याची खंत फापळे यांनी व्यक्त केली. रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्याविरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचे फापळे म्हणाले. यावेळी प्रा. वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजीबुवा महाले, अरविंद सावंत आणि इतर यात्रेकरू उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या