शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!
2
ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!
3
गतविजेत्या इंग्लंडला धक्का! युरोपियन संघाविरुद्ध T20 World Cup मध्ये विजयाची पाटी कोरीच
4
अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का
5
महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले
6
"अमोलची माफी मागितली, पण ४८ मतांनी जिंकलो ही..."; निसटत्या विजयानंतर वायकरांची प्रतिक्रिया
7
कर्णधाराने कॅच सोडली, नेपाळने मॅच गमावली! नेदरलँड्सचा रोमहर्षक विजय, मॅक्स ओ'डोडचा तडाखा
8
"…म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  
9
Rohit एकटा भिडला, वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पराक्रम केला; नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा वर्चस्मा 
10
“आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
11
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार; समोर आली NDA सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख...
12
"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
13
बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  
14
Lok Sabha Election Result 2024 : "...अन् आम्हाला आत्मविश्वास मिळाला", म्हस्केंनी विजयानंतर सांगितलं 'राज'कारण
15
Lok Sabha Election Result 2024 : "वाटाघाटी करणार नाही..," चिराग पासवान यांची मोठी घोषणा; PM मोदींबाबतही मोठं वक्तव्य
16
Mumbai North West Lok Sabha Election Result 2024: खत्तरनाक! फक्त ४८ मतांनी विजय; रवींद्र वायकर आधी हरले, फेरमोजणीनंतर जिंकले
17
"देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर", निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया
18
"भविष्यात हे चित्र बदलण्याची..."; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
20
ममता बॅनर्जींचं मोठं विधान! भाजपाला PM पदासाठी सुचवला चेहरा; कोण आहे 'तो' नेता?

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले 

By धीरज परब | Published: October 03, 2022 2:53 PM

आधीच ध्वनी प्रदूषण त्यात वाहतूक कोंडी मुळे भाईंदरकर त्रासले आहेत. 

मीरारोड : मीरा भाईंदर मध्ये नवरात्री निमित्त ध्वनी प्रदूषण खूपच वाढले असताना दुसरीकडे आयोजकांच्या बेजबाबदार लोकांना पोलिसांकडून पाठीशी घातले जात असल्याने सायंकाळ पासून रात्री पर्यंत वाहतूक कोंडी सुद्धा प्रचंड होत आहे. नवरात्री उत्सवासाठी रात्री १० व काही दिवस रात्री १२ वाजे पर्यंतची ध्वनिक्षेपक, वाद्यवृंदाची परवानगी दिली असली तरी कायदे नियम व न्यायालयाच्या आदेशानुसार घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे शहरात सर्रास उल्लंघन केले जात आहे. परंतु पोलिसांकडून मात्र ध्वनी मर्यादेच्या नियमांचे काटेकोर पालन व कारवाई केली जात नसल्याने ध्वनी प्रदूषण करणारे आयोजक मोकाट आहेत. मात्र या मुळे रुग्णालय क्षेत्रासह निवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण वाढल्याने रुग्ण, वृद्ध, परीक्षा असणारे विद्यार्थी, आदींना ध्वनी प्रदूषणाचा जाच सहन करावा लागत आहे. 

त्यातच आयोजकांकडून नवरात्री साठी आवश्यक वाहन पार्किंग आणि कार्यकर्त्यांचे नियोजन केले गेले नसताना देखील पोलीस आणि पालिकेने लागेबांधे सांभाळत कार्यक्रमांच्या परवानग्या दिल्याचे उघड झाले आहे. अनेक ठिकाणी तर आयोजकांकडून रस्ता पूर्णपणे बंद करून वा रस्ता नाममात्र मोकळा ठेवला आहे. रहदारीच्या सार्वजनिक रस्त्यांवरच नवरात्री दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्यांची वाहने बेशिस्तपणे कुठे ही उभी केली जात आहेत. जेणेकरून प्रचंड वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचा मनःस्ताप वाढला आहे. भाईंदर पश्चिमेला तर अग्निशमन दलाचा मार्गच ह्या वाहतूक कोंडीने कोंडला गेला आहे. भाईंदर उड्डाण पूल व परिसरात तर वाहन कोंडी मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. 

आवाजाच्या मर्यादेचे उघड उल्लंघन होत आहे. ध्वनी प्रदूषण त्रासदायक ठरले असताना त्यात वाहन कोंडीची भर आणखी जाचक ठरली आहे. नागरिकांचे हित, कायदे - नियम व न्यायालयाच्या आदेशांना आयोजकांच्या आर्थिक व राजकीय फायद्यासाठी पोलीस आणि पालिकेने संपूर्ण शहर वेठीस धरले आहे.  बेजबाबदार अधिकारी व आयोजकांवर कठोर कारवाई करावी व उल्लंघन करणाऱ्यांना परवानग्या देऊ नये. असे मराठी एकिकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी म्हटले. 

 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीbhayandarभाइंदरNavratriनवरात्री