शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:23 IST

पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

वासिंद : पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंदाने भातपेरणीची कामे उरकली. मात्र, सध्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी केलेली भातरोपे करपण्याची व योग्य प्रमाणात न उगवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने, तर काही कृषी केंद्रांतून अधिक किमतीचे आपल्या आवडीनुसार दप्तरी, जोरदार, शबरी, कर्जत असे हलवार, तर सुवर्णा, मसुरी, कर्जत-७ अशी भात बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. एकीकडे भात बियाणे, शेतमजूर, यंत्रसामग्री ही महागाईची ठरत असतानाही काही हौशी, मेहनती शेतकरी अद्यापही शेती करत आहेत.पावसाचे संकेत दिसताच शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीवर जो दाणा राहिला आहे, त्याची पावडर होईल व त्यातच जमिनीत कमी प्रमाणात गेलेला भात हा उगवताना जोमदार नसेल, त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल.- प्रा. प्रकाश भांगरथ, कृषी तंत्र

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे