शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

नियमबाह्य कामे रोखल्याने झाला आयुक्त गीतेंचा घात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:57 IST

पालिका निवडणुकीआधी वर्षभर आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फारसा विरोध न करणा-या भाजपाने दालने बंद ठेवत त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडल्याने आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावून त्यांची उचलबांगडी केल्याचे आरोप सुरू झाल्याने या विषयावर त्या पक्षाची पुरती कोंडी झाली आहे.

मीरा रोड : पालिका निवडणुकीआधी वर्षभर आयुक्त डॉ. नरेश गीते यांना फारसा विरोध न करणा-या भाजपाने दालने बंद ठेवत त्यांच्याविरूद्ध मोहीम उघडल्याने आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना मध्यस्थी करायला लावून त्यांची उचलबांगडी केल्याचे आरोप सुरू झाल्याने या विषयावर त्या पक्षाची पुरती कोंडी झाली आहे. नियमबाह्य कामांना विरोध, कायद्यात न बसणारे ठराव मंजूर झाल्यानंतर तेही सरकारकडे विखंडनासाठी पाठवल्यानेच त्यांची बदली झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.सलग तीन आयएएस अधिकारी पालिकेत न टिकल्याने आणि आताही अशा अधिकाºयाऐवजी पदोन्नतीतील अधिकाºयाची नेमणूक करण्याचा आग्रह धरण्यात आला होता. पण तो डावलून मुख्यमंत्र्यांनी आयएएस अधिकारी दिला. त्यामुळे मीरा-भार्इंदरमधील राजकीय परिस्थितीचेच आव्हान नव्या अधिकाºयाला पेलावे लागण्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीपूर्वी मावळते आयुक्त गीते यांच्याशी जुळवून घेणाºया आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळताच आयुक्तांना हटवण्यासाठी उघडपणे निर्णायक आघाडी उघडली. यामागे प्रस्तावित विकास आराखड्यातील घोळ, बिल्डर लॉबीच्या आवळलेल्या नाड्या, काटेकोर अर्थसंकल्पाची तयारी, प्रशासकीय कामकाजातील चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी घेतलली कठोर भूमिका आदी अनेक कारणे असल्याची चर्चा सुरू आहे. मेहता समर्थकांनी मात्र आयुक्तांची निर्णय दिरंगाई, ठरावांवर न केली जाणारी अमलबजावणी आदी कारणे त्यांना भोवल्याचे म्हटले आहे. मेहतांबाबत पोकळ अफवा पसरवण्यात आल्या. उलट शहर विकासासाठी प्रशासनाचा कारभार गतीमान व्हावा, अशीच मेहतांची भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचा एकही प्रस्ताव दिलेला नाही. अतिक्रमण तोडणे, फेरीवाले हटवणे आदी कामे झालेली नाहीत. ठरावांवर अंमलबजावणी न झाल्याने पालिकेचे उत्पन्न रोडावले. विकासकामांना खीळ बसल्याचा दावा भाजपाच्या सूत्रांनी केला.वादग्रस्त ठरलेले पण आ. मेहतांच्या मर्जीतील आयुक्त अच्युत हांगे यांची उचलबांगडी झाल्यानंतर पालिका आयुक्तपदी बालाजी खतगावकर, गणेश देशमुख आदींसाठी आग्रह धरला जात होता. पण आॅगस्ट २०१६ मध्ये डॉ. नरेश गीते यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा भाजपाच शिवसेनेसोबत सत्तेत होती आणि भाजपाच्या गीता जैन महापौर होत्या. तेव्हा जैन यांचे आयुक्तांशी पटत नसले, तरी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर मेहतांनी जाहीरपणे विरोधाची भूमिका घेतली नव्हती. पण पालिकेत एकहाती सत्ता आल्यानंतर मात्र नियम-कायद्यात न बसणारे अनेक ठराव बहुमताने मंदूर झाले. त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह सुरू झाला. प्रशासकीय कामाकाजवर पकड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले. भाजपाच्या एकछत्री वर्चस्वामुळे पालिकेचे अधिकारी व कर्मचारी ‘होयबा’ होऊ लागले. कोणती अनधिकृत बांधकामे तोडायची हे ठरवण्यापासून रस्ता रुंदीकरणापर्यंत सर्वत्र हस्तक्षेपाचा प्रयत्न सुरू झाल्याने वेगवेगळी कारणे पुढे करत संघर्ष होऊ लागला.भाजपा नगरसेविका मीना कांगणे यांचे पती माजी नगरसेवक यशवंत कांगणे यांनी ‘साई गेस्ट हाऊस’ या बेकायदा लॉजचे पुन्हा बांधकाम केल्याने पालिकेने ते १९ जाानेवारीला तोडायला घेतले. त्याच वेळी आयुक्तांच्या निषेधार्थ महापौर, उपमहापौर, विविध सभापतींनी आपली पालिकेतील दालने बंद केली. पण त्यासाठी वेगळे कारण पुढे केले. लगेचच परिवहन कर्मचारी, संगणक चालकांचा संप झाला. आयुक्तांची चोहोबाजूने कोंडी सुरू झाली.पालिकेचा विकास आराखडा आ. मेहतांचे निकटवर्ती नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी तयार केला, पण त्यावर राजकीय छाप असल्याची चर्चा सुरू असतानाच आयुक्तांनी त्याची फेरपडताळणी करण्याचा पवित्रा घेतला होता. बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेची चेकलिस्ट तयार केल्याने बिल्डरांना चाप बसला. पालिकेला देय असलेल्या जागा आधी पालिकेच्या नावे करुन ताब्यात देण्यास बजावल्याने बिल्डर लॉबी हादरली होती. नवे बांधकाम नकाशे मंजूर होत नव्हते. निविदांच्या दरातही त्यांनी कपात करायला लावली होती. त्यानंतर पुन्हा हांगे यांना आयुक्तपदी आणण्याचे प्रयत्न सुरू झाले, पण त्याला मुख्यमंत्र्यांकडून नकार मिळाला. त्यामुळे पुन्हा खतगावकर किंवा देशमुख यांच्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु मुख्यमंत्री सनदी अधिकाºयावर ठाम राहिल्याने अखेर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बी. जी. पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.>शिवसेनेचा ठिय्या : भार्इंदर : आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारीवरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली केल्याचा आरोप करून त्याविरोधात शिवसेनेच्या नगरसेवकांनी मंगळवारी महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून आदेशाच्या प्रतींची होळी केली. मेहता यांच्या मर्जीनुसार त्यांच्या समक्ष सोमवारी आयुक्तांच्या बदलीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला. हाच का पारदर्शकपणा, असा टोलाही शिवसेनेने लगावला.>काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांना पत्रआयुक्तांच्या बदलीचा निषेध करत ती आक्षेपार्ह असल्याचे काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी म्हटले आहे. सत्ताधाºयांची टक्केवारी बंद झाल्यानेच त्यांनी आयुक्तांविरोधात बदलीचे षड्यंत्र रचले. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसह जनमताचा कौल पाहून ही बदली रद्द करावी, असे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.>‘बदलीची मागणीकेली नव्हती’बांधकाम परवानग्यांशी आमचा काही संबंध नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीची मागणी केलेलीच नाही. उलट आयुक्तांनी विकासकामे खोळंबून ठेवल्याने ती सुरु करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोड