शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वयाच्या जाचक अटीमुळे दाेन हजार  होमगार्ड्सवर आली उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:37 AM

कोरोनामुळे खबरदारी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गृहरक्षक दलातील (होमगार्ड) ५०हून अधिक वयोगटातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका होऊ शकतो, असे गृहीत धरून राज्य सरकारने गेल्या १३ महिन्यांपासून बंदोबस्तासारखे काम देणे बंद केले आहे. त्यामुळे या दोन हजार कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वयाची ही अट शिथिल करून ठाणे जिल्ह्यातील शेकडो जवानांना पुन्हा कामावर रुजू करावे, असे साकडे या कर्मचाऱ्यांनी होमगार्डचे राज्याचे महासमादेशक परमबीर सिंह यांना घातले आहे.

ठाणे जिल्ह्यातील होमगार्डच्या जवानांनी महासमादेशकांना दिलेल्या आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, होमगार्डचे जवान हे पगारी नोकर नाहीत. मानसेवी संघटनेत ते कार्यरत आहेत. परंतु, अनेकांची २० वर्षांहून अधिक सेवा झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कार्यकाळापासून संचारबंदीमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून जिल्ह्यातील नऊ हजार ५००पेक्षा अधिक होमगार्डच्या जवानांनी सेवा दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये नऊ हजार ५०० पैकी तब्बल दोन हजार जवानांना एकदाही काम देण्यात आले नाही. त्यांनी जिल्हा कार्यालयात विचारणा केली तर तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तीन तीन महिने उशिराने भेटणाऱ्या मानधनावरच या जवानांचे संसार चालतात. पण आता तेही बंद झाले. 

एकीकडे कोरोनाकाळात अनेकांची कामे बंद झाली. सध्या दुकानेही बंद आहेत. त्यामुळे इतरत्र कुठेही काम किंवा खासगी नोकरीही करता येत नाही. कामच मिळत नसेल तर या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जगायचे कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जे शरीराने तंदुरुस्त असतील त्यांना तरी बंदोबस्ताची कामे दिली जावीत. ५०पेक्षा जास्त वयोगटातील असूनही पोलिसांना बंदोबस्त किंवा सर्व प्रकारची कामे दिली जात असतील तर हाच न्याय होमगार्डच्या जवानांनाही दिला जावा, अशी मागणीही या पत्रात केली आहे.

गेल्यावर्षी मार्चपासून रेल्वे, वाहतूक आणि शहरातील सर्व बंदोबस्तावरील ५०पेक्षा अधिक वयोगटातील होमगार्ड कर्मचाऱ्यांना काम देण्यात आलेले नाही. निवृत्तीपर्यंत सर्वांनाच कोरोनाच्या या कठीण काळात कामे दिली जावीत.- होमगार्ड जवान, ठाणे.