शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

ठाण्यात महावितरणच्या हलगर्जीमुळे चिमुकलीचा नाहक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:35 IST

वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे लोकमान्यनगरातील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची घटना सोमवारी घडली. मुलीचा नाहक बळी गेल्यामुळे वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हानुकसानभरपाईची पालकांची मागणीलोकमान्यनगर येथील घटना

ठाणे : महावितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे लोकमान्यनगर पाडा क्रमांक चार येथील सिद्धी रामचंद्र गुप्ता (९) या चिमुकलीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी वीज कर्मचारी दत्ता पाटील यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून महावितरण कंपनीने नुकसानभरपाई देण्याची मागणी मुलीच्या पालकांसह येथील रहिवाशांनी केली आहे.महावितरण कंपनीचे कर्मचारी दत्ता पाटील यांनी १ एप्रिल २०१८ रोजी पाडा क्रमांक चार येथील टेमकर चाळीत वीजवाहिनी टाकण्याचे काम केले. ते करताना कोणतीही तपासणी न करता ती तशीच चाळीच्या पत्र्यावर टाकून ते निघून गेले. ती वाहिनी उघडी किंवा कुठेतरी कट झालेली होती. त्यामुळे चाळीच्या लोखंडी अँगल, जिना आणि कमलेश उतेकर यांच्या घरासमोरील सुरक्षा ग्रीलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. २ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चाळीच्या लोखंडी जिन्याजवळ सिद्धी आल्यानंतर तिला या वीजेच्या जबर धक्का बसला. तिला शेजाºयांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलीचे नातेवाईक कमलेश उतेकर यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीचे कर्मचारी दत्ता पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. केवळ गुन्हा दाखल न होता नुकसानभरपाईदेखील मिळावी, अशी मागणीही या कुटूंबियांनी तसेच परिसरातील रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाAccidentअपघात