शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 04:47 IST

वडिलांचा आरोप : न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, बसचालकावर व्यक्त केला संशय

अंबरनाथ : येथील म्हाडा कॉलनी परिसरातील एमआयडीसी रोडवर दुपारी एका बसच्या धडकेत कॉलेजमधील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालकावर संशय व्यक्त करून या प्रकरणी तपास करण्याची मागणी मृत तरूणाच्या वडिलांनी केली होती. मात्र या प्रकरणात तपास केला जात नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

२६ आॅक्टोबर २०१८ मध्ये दुपारी सव्वा वाजता दीपक मानवतकर यांचा १८ वर्षाचा मुलगा तेजेश मानवतकर हा आपला मित्र चंद्रशेखर कुशवाह याच्यासोबत साऊथ इंडियन कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी परतत होता. यावेळी म्हाडा कॉलनीजवळ त्यांची दुचाकी आली असता एका भरधाव बसने त्यांना मागून धडक दिली. यावेळी बस रिकामी होती. अपघातात दोघे तरूण बसखाली आल्याचे लक्षात येताच बसचा चालक जयवंत पवार याने पळ काढला. या अपघातात जखमी झालेला तेजेश आणि चंद्रशेखर या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर बसच्या चालकाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले. तर काही दिवसातच अपघातग्रस्त बसही सोडून देण्यात आली. मात्र या प्रकणरात तेजेश यांचे वडील दीपक यांनी बस चालकावर संशय व्यक्त केला आहे.

कट रचून हा अपघात घडविल्याचा त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अपघाताच्यावेळी दुचाकीला जी धडक बसली ती बसच्या उजव्या बाजूने बसली. यावरुन स्पष्ट होते की बसचालक ज्या बाजूला बसला होता त्याच बाजूने धडक बसल्याने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर दोन्ही मुले जिवंत असतानाही बस चालकाने त्यांना रूग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढला. त्याने या मुलांना रूग्णालाात हलविले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणात बसचालकाची चौकशी केल्यास नेमका हा कट का रचण्यात आला याची माहिती पुढे येऊ शकते असे तक्रारीत नमूद केले आहे. या अपघाताची चौकशी केल्यास हा सर्व प्रकार कट रचून केल्याचे समोर येईल असे मानवतकर यांनी स्पष्टकेले. आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही म्हणून मानवतकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.संघर्ष सुरूच राहणारमानवतकर हे दिव्यांग असून तेजेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या जगण्याची उमेदच निघून गेली आहे. मात्र मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आपला संघर्ष सुरु राहील, असे मानवतकर यांनी स्पष्ट केले. सरकार न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातMurderखून