शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

कट रचून माझ्या मुलाचा अपघात घडवून आणल्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 04:47 IST

वडिलांचा आरोप : न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे, बसचालकावर व्यक्त केला संशय

अंबरनाथ : येथील म्हाडा कॉलनी परिसरातील एमआयडीसी रोडवर दुपारी एका बसच्या धडकेत कॉलेजमधील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बस चालकावर संशय व्यक्त करून या प्रकरणी तपास करण्याची मागणी मृत तरूणाच्या वडिलांनी केली होती. मात्र या प्रकरणात तपास केला जात नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

२६ आॅक्टोबर २०१८ मध्ये दुपारी सव्वा वाजता दीपक मानवतकर यांचा १८ वर्षाचा मुलगा तेजेश मानवतकर हा आपला मित्र चंद्रशेखर कुशवाह याच्यासोबत साऊथ इंडियन कॉलेजमधून परीक्षा देऊन घरी परतत होता. यावेळी म्हाडा कॉलनीजवळ त्यांची दुचाकी आली असता एका भरधाव बसने त्यांना मागून धडक दिली. यावेळी बस रिकामी होती. अपघातात दोघे तरूण बसखाली आल्याचे लक्षात येताच बसचा चालक जयवंत पवार याने पळ काढला. या अपघातात जखमी झालेला तेजेश आणि चंद्रशेखर या दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर बसच्या चालकाला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला जामिनावर सोडण्यात आले. तर काही दिवसातच अपघातग्रस्त बसही सोडून देण्यात आली. मात्र या प्रकणरात तेजेश यांचे वडील दीपक यांनी बस चालकावर संशय व्यक्त केला आहे.

कट रचून हा अपघात घडविल्याचा त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. अपघाताच्यावेळी दुचाकीला जी धडक बसली ती बसच्या उजव्या बाजूने बसली. यावरुन स्पष्ट होते की बसचालक ज्या बाजूला बसला होता त्याच बाजूने धडक बसल्याने हा प्रकार जाणूनबुजून केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर दोन्ही मुले जिवंत असतानाही बस चालकाने त्यांना रूग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळ काढला. त्याने या मुलांना रूग्णालाात हलविले असते तर त्यांचा जीव वाचला असता असेही या तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणात बसचालकाची चौकशी केल्यास नेमका हा कट का रचण्यात आला याची माहिती पुढे येऊ शकते असे तक्रारीत नमूद केले आहे. या अपघाताची चौकशी केल्यास हा सर्व प्रकार कट रचून केल्याचे समोर येईल असे मानवतकर यांनी स्पष्टकेले. आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही म्हणून मानवतकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. मुख्यमंत्री कुठला निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.संघर्ष सुरूच राहणारमानवतकर हे दिव्यांग असून तेजेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आमच्या जगण्याची उमेदच निघून गेली आहे. मात्र मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आपला संघर्ष सुरु राहील, असे मानवतकर यांनी स्पष्ट केले. सरकार न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघातMurderखून