शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मनपाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने त्रस्त भाजपा नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:17 PM

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही ...

ठळक मुद्देकोट्यावधी रूपये खर्च करूनही पाणी समस्या कायममुख्य जलवाहिनीतून लोकांचे नळ कनेक्शनआत्महत्या करण्यास निघताना वाढला रक्तदाब

भिवंडी : शहरातील नारपोलाी भागात साठेनगर या डोंगरावरील वसाहतीत मागील अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रूपये खर्च करूनही नियोजन नसल्याने तेथे पाणी समस्या कायम आहे. त्याचा त्रास तेथील रहिवाश्यांना सहन करावा लागत असल्याने हि समस्या दूर करण्यासाठी नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. तरी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने अखेर भाजप नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी आज महासभेत प्रशासनास जाब विचारीत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे जाहिर करीत त्या महासभेतून उठून गेल्या. परंतू सभागृहातून धावत बाहेर पडल्याने त्यांना चक्कर आल्याने त्या खाली पडल्या. या घटनेने महासभेत गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना तात्काळ स्व.इंदिरागांधी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.शहरातील नारपोली भागात टेकडीवर वसलेल्या साठेनगर येथे सुमारे पन्नास हजार लोकांची वस्ती असून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गंभीर पाणी समस्या आहे. ही समस्या कायमरित्या संपावी या करीता तेथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र त्या टाकीत पाणी कां पोहोचत नाही? याकडे पाणी पुरवठा अधिका-यांचे लक्ष नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. टाकीकडे जाणा-या जलवाहिनीतून कोणासही नळ कनेक्शन न दिल्यास टाकीत पाणी साठा होऊन त्याचे लोकवस्तीत वितरण करणे शक्य आहे. परंतू पाणी टाकीत जाण्यापुर्वी लोकांनी जोडणी केल्याने ही समस्या कायम आहे. महानगरपालिकेच्या कामात व पाणीपुरवठ्याच्या कामात हस्तक्षेप करणा-यांवर पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. या बाबत भाजपा नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी वेळोवेळी आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या असून त्यांनी या बाबत निर्वाणीचा इशारा देणारे पत्र ४ फेब्रुवारी रोजी दिले होते. त्या पत्रामध्ये समस्या न सोडविल्यास महानगरपालिका मुख्यालयांच्या तीस-या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा नगरसेविका बगाडे यांनी दिला होता .आज सोमवार दि ११ रोजी दुपारनंतर महासभा सुरू असताना नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी या विषयावर पुन्हा एकदा आपली पाणी समस्येची व्यथा मांडून झाल्यावर आत्महत्या करण्यासाठी तावातावाने सभागृहाबाहेर जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांचा रक्तदाब वाढून त्यांना चक्कर आल्याने त्या खाली कोसळल्या.त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. या घटनेनंतर कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक यांनी सभागृहात धाव घेतली. त्यांना उचलून तात्काळ स्व.इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रूग्णालयात येथे उपचाराकरीता दाखल केले . त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. या प्रकाराबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.या बाबत आयुक्त मनोहर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या समस्येवर उपाय करण्यासाठी पाणीपुरवठा अधिकारी व विरोधीपक्ष नेता यांच्यात बैठक घडवून तोडगा काढण्याचे ठरले होते. त्या दृष्टीने काम सुरू केले असून येत्या दोन दिवसात ते मार्गी लागणार असल्याने साखराबाई बगाडे यांनी असे पाऊल उचलणे गैर असल्याचे सांगितले .

टॅग्स :Bhiwandiभिवंडीwater scarcityपाणी टंचाई