शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यमापन न झाल्याने शिक्षण क्षेत्राची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:50 IST

अजय देशमुख : डोंबिवलीत ‘सीबीसीएस’ विषयावर कार्यशाळा, ७० शिक्षक उपस्थित

डोंबिवली : शिक्षकांनी जे शिकवले त्याचे विद्यार्थ्याला योग्य आकलन झाले आहे का, याचे मूल्यमापन होत नसल्याने शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातर्फे मंगळवारी स्वामी विवेकानंद राणाप्रताप शाळेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. या कार्यशाळेला कल्याण-डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांतील ७० शिक्षक उपस्थितीत होते. यावेळी कुलपतींच्या मुंबई विद्यापीठ परिषदेवरील प्रतिनिधी दीपक मुकादम, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा पळसुलेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. देशमुख यांनी सांगितले, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठ यांनी मिळून चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही योजना आणली आहे. तिचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. शिक्षकांचा जोपर्यंत संवाद होणार नाही, तोपर्यंत या योजनेची उकल होणार नाही. शिक्षकांनी प्रथम ही योजना समजून घेऊन त्यानंतर ती विद्यार्थ्याना सांगितली पाहिजे.या योजनेमुळे उत्क्रांतीला व कल्पनाशक्तीला चालना मिळणार आहे. त्यासाठी ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा गणिताचा अभ्यास चांगला आहे. तर त्याने इतर विषयांचा विचार करावा, म्हणून सीबीसीएस ही योजना आणली आहे. एखादा अभ्यासक्रम चालू करण्याची इच्छा व्यक्त करणे सोपे असते. परंतु, त्याच्या मर्यादा काय असू शकतात, याचाही विचार झाला पाहिजे.देशमुख पुढे म्हणाले, विद्यापीठ हे महाविद्यालयांसाठीच आहेत. महाविद्यालये आहेत म्हणून विद्यापीठ आहे. सर्व शैक्षणिक संस्था या सक्षमपणे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कसोटीला खऱ्या उतरतात की नाही हे पाहण्याची गरज आहे. शिक्षकांची गुणवत्ता कशी आहे, त्यावर शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अवलंबून असते. शिक्षणाचा विकास हा गुरूकुल ते कुलगुरू या पद्धतीने साधायचा आहे. शैक्षणिक विकास साधण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाचा आणि विद्यापीठाच्या माध्यमातून समाजाचा विकास होईल. त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे. उच्च शिक्षणाचा यज्ञ कसा प्रज्वलित राहील आणि त्यातून राष्ट्र दैदिप्यमान कसे होईल, हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे, असे ही त्यांनी सांगितले.

कोणत्याही योजनेचे स्वागत मोठ्या उत्साहाने होते. मात्र, त्यात काही त्रुटी राहिल्या तर त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई विद्यापीठाची ओळख ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अशी आहे. ही ओळख पुसायची की शिक्षणाची प्रशस्त दालने उभी करायची हा मोलाचा प्रश्न आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा भाषेचा अभ्यास चांगला आहे. परंतु, त्या विद्यार्थ्याने मग मानवाच्या इतर अंतरंगाची ओळख करून घ्यायची नाही का, असा सवाल ही देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.विधी महाविद्यालयाचा प्रस्तावसुभाष वाघमारे म्हणाले, संस्थेतर्फे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठाला प्रस्ताव पाठविणार आहोत. ठाणे जिल्हा परिसरात विधी महाविद्यालय नसल्याने ते डोंबिवलीत सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची सोय होईल. तसेच इतर ही काही अभ्यासक्रम सुरू करता आले तर ते सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणMumbai Universityमुंबई विद्यापीठ