शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

मूल्यमापन न झाल्याने शिक्षण क्षेत्राची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:50 IST

अजय देशमुख : डोंबिवलीत ‘सीबीसीएस’ विषयावर कार्यशाळा, ७० शिक्षक उपस्थित

डोंबिवली : शिक्षकांनी जे शिकवले त्याचे विद्यार्थ्याला योग्य आकलन झाले आहे का, याचे मूल्यमापन होत नसल्याने शिक्षण व्यवस्थेची वाट लागली आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी केले आहे.

स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातर्फे मंगळवारी स्वामी विवेकानंद राणाप्रताप शाळेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. या कार्यशाळेला कल्याण-डोंबिवलीतील शाळा आणि महाविद्यालयांतील ७० शिक्षक उपस्थितीत होते. यावेळी कुलपतींच्या मुंबई विद्यापीठ परिषदेवरील प्रतिनिधी दीपक मुकादम, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा पळसुलेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. देशमुख यांनी सांगितले, शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठ यांनी मिळून चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही योजना आणली आहे. तिचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. शिक्षकांचा जोपर्यंत संवाद होणार नाही, तोपर्यंत या योजनेची उकल होणार नाही. शिक्षकांनी प्रथम ही योजना समजून घेऊन त्यानंतर ती विद्यार्थ्याना सांगितली पाहिजे.या योजनेमुळे उत्क्रांतीला व कल्पनाशक्तीला चालना मिळणार आहे. त्यासाठी ही पद्धत महत्त्वाची ठरणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा गणिताचा अभ्यास चांगला आहे. तर त्याने इतर विषयांचा विचार करावा, म्हणून सीबीसीएस ही योजना आणली आहे. एखादा अभ्यासक्रम चालू करण्याची इच्छा व्यक्त करणे सोपे असते. परंतु, त्याच्या मर्यादा काय असू शकतात, याचाही विचार झाला पाहिजे.देशमुख पुढे म्हणाले, विद्यापीठ हे महाविद्यालयांसाठीच आहेत. महाविद्यालये आहेत म्हणून विद्यापीठ आहे. सर्व शैक्षणिक संस्था या सक्षमपणे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कसोटीला खऱ्या उतरतात की नाही हे पाहण्याची गरज आहे. शिक्षकांची गुणवत्ता कशी आहे, त्यावर शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता अवलंबून असते. शिक्षणाचा विकास हा गुरूकुल ते कुलगुरू या पद्धतीने साधायचा आहे. शैक्षणिक विकास साधण्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाचा आणि विद्यापीठाच्या माध्यमातून समाजाचा विकास होईल. त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे. उच्च शिक्षणाचा यज्ञ कसा प्रज्वलित राहील आणि त्यातून राष्ट्र दैदिप्यमान कसे होईल, हे आपण पाहण्याची आवश्यकता आहे, असे ही त्यांनी सांगितले.

कोणत्याही योजनेचे स्वागत मोठ्या उत्साहाने होते. मात्र, त्यात काही त्रुटी राहिल्या तर त्याची अंमलबजावणी होत नाही. मुंबई विद्यापीठाची ओळख ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अशी आहे. ही ओळख पुसायची की शिक्षणाची प्रशस्त दालने उभी करायची हा मोलाचा प्रश्न आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा भाषेचा अभ्यास चांगला आहे. परंतु, त्या विद्यार्थ्याने मग मानवाच्या इतर अंतरंगाची ओळख करून घ्यायची नाही का, असा सवाल ही देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला.विधी महाविद्यालयाचा प्रस्तावसुभाष वाघमारे म्हणाले, संस्थेतर्फे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठाला प्रस्ताव पाठविणार आहोत. ठाणे जिल्हा परिसरात विधी महाविद्यालय नसल्याने ते डोंबिवलीत सुरू झाल्यास विद्यार्थ्यांची सोय होईल. तसेच इतर ही काही अभ्यासक्रम सुरू करता आले तर ते सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणMumbai Universityमुंबई विद्यापीठ