शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

आंतरजिल्हा बदलीमुळे राज्यभरातील त्रस्त शिक्षकाना नव्या निर्णयाचा दिलासा; आवडीच्या जिल्ह्यात राहण्याची संधी

By सुरेश लोखंडे | Updated: October 11, 2018 16:11 IST

गेल्या वर्षी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील सुमारे साडे आठशे शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांच्या बदल्या पालघरमध्ये झाल्या. तर पालघरच्याही बहुतांशी शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. पण या बदल्या बहुतांशी शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. पण कौटुंबिक अडचणी वाढल्या. त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नाही. अन्यही विविध कारणांमुळे संबंधीत शिक्षकांनी या बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या इच्छेविरोध्दच्या आंतरजिल्हा बदल्यां रद्द करण्यासाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला

ठळक मुद्दे* संबंधीत शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्ष त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही.* शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधीत होणार नाही.ठाणे, पालघर जिल्ह्यांसह राज्यभरातील अन्यही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांचा फायदा होईल 

ठाणे : ठाणे, पालघर जिल्ह्यांसह राज्यभरातील अन्यही जिल्ह्यातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. इच्छेविरूध्द या संगणकीय प्रणालीच्या बदल्यामुळे बहुतांशी शिक्षक विविध कारणांस्तव त्रस्त आहेत. यास विचारात घेऊन बुधवारी १० आॅक्टोंबर रोजी ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. शं. कांबळे यांनी शासन निर्णय जारी करीत या शिक्षकांना त्यांच्याच जिल्ह्या राहण्याची संधी विविध अटीव्दारे दिली. या निर्णयामुळे आधीच दिवाळी भेट प्राप्त झाल्याचा आनंद शिक्षकांमध्ये आहे.गेल्या वर्षी २०१७ -१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील सुमारे साडे आठशे शिक्षकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांच्या बदल्या पालघरमध्ये झाल्या. तर पालघरच्याही बहुतांशी शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. पण या बदल्या बहुतांशी शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. पण कौटुंबिक अडचणी वाढल्या. त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नाही. अन्यही विविध कारणांमुळे संबंधीत शिक्षकांनी या बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या इच्छेविरोध्दच्या आंतरजिल्हा बदल्यां रद्द करण्यासाठी सुधारित धोरण ग्राम विकास विभागाने हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्या रद्द करण्याचे लेखी आदेशही जारी केले आहे. यामुळे राज्यभरातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे कळीचा मुद्दा ठरलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या आता रद्दच होणार असल्याची शिक्षक वर्गात जोरदार चर्चा आहे.ज्या शिक्षकाना आंतरजिल्हा बदल्या नको आहेत, अशा शिक्षकांना त्यांच्या मुळे जिल्हा परिषदेमध्ये विविध अटी व शर्तींवर कायम ठेवण्याचे आदेश आहेत. दिवाळीच्या या दीर्घ सुट्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या मुळ जिल्हा परिषदेमध्ये पाठविण्याबाबतची कार्यवाही संबंधीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी करावी असे आदेश कांबळे यांनी जारी केले आहेत. यामुळे या बदल्यामुळे त्रस्त असलेल्या शिक्षकांची दिवाळी पुन्हा गोड झाली आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या हिताचा हा शासन निर्णय घटस्थापनेच्या दिवशीच जारी झाल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे. या बदल्यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकाना आता पुन्हा त्यांच्या आवडीच्या जिल्ह्यात व त्यांच्या शाळेवर जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.** शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यासाठीच्या अटी व शर्ती -* संबंधीत शिक्षकास अद्याप कार्यमुक्त केलेले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त करू नये. त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश सीईओ यांनी काढावेत.* कार्यमुक्त केलेले असल्यास वा त्यांना आंतरजिल्हा बदली नको असल्यास, त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जावयाचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद निक्त असणे गरजेचे आहे.* संबंधीत शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्ष त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचा अधिकार राहणार नाही.* शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधीत होणार नाही.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षक