शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अपूर्णावस्थेतील मुंब्रा बायपास धोकादायक, रस्त्यावर माती पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:40 IST

चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले.

- कुमार बडदेमुंब्रा : चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले. अपूर्णावस्थेतील एखाद्या रस्त्याचे इतक्या वेळा उद्घाटन करण्याची ही घटना जागतिक विक्रम म्हणून नोंदवला जाण्याची गरज असल्याचे मत या रस्त्यावरून सोमवारी प्रवास केलेल्या प्रवाशांनी व्यक्त केले.या रस्त्यावरील अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यासाठी रेतीबंदर परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर लावण्यात आलेले लोखंडी पिलर अद्याप काढण्यात आलेले नाहीत. बायपासवरील दुभाजकांची कामे अपूर्ण आहेत. दुभाजकांच्या जागेवर काही ठिकाणी फक्त लोखंडी सळया लावण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण ओले असतानाही त्यावरून वाहने गेल्यामुळे खड्डे पडले आहेत. मुंब्रादेवी डोंगराच्या पायथ्याजवळ रस्ता रुंदीकरणासाठी फक्त माती टाकण्यात आली आहे. पुढील काम करून रस्ता तयार करण्यात आलेला नाही. ठाण्याच्या दिशेकडील रस्त्यावर पावसाळ्यात आलेली डोंगरावरील माती ठिकठिकाणी तशीच पसरलेली आहे. यामुळे मुख्य रस्ता अरु ंद झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उंचसखल झाला आहे. त्यावरून वाहने चालवताना हादरे बसत असल्याची चालकांची तक्रार आहे. कामासाठी आणण्यात आलेली अवाढव्य यंत्रे अजूनही बायपासवर असून काम अपूर्ण असल्याची साक्ष देत आहेत. कामासाठी आणण्यात आलेला सिमेंटसदृश भुसा एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून आहे. जवळून वेगाने वाहने जाताच तो हवेत उडत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत आहे. त्यामुळे वाहनचालकाला पुढची वाहने व्यवस्थित दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत बंदमुळे उद्घाटनानंतरच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरून तुरळक वाहने सुरू होती. त्यामुळे अपूर्णावस्थेतील रस्त्याचे उद्घाटन करण्याचे धोके अजून अनुभवास आलेले नाहीत. घाईघाईने रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याबद्दल अनेक वाहनचालकांनी ‘लोकमत’कडे आश्चर्य व्यक्त केले. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही केली.>पत्रीपुलावर कोंडी कायमडोंबिवली : मुंब्रा बायपास खुला झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिलासा मिळाला. हा रस्ता बंद असल्याने पत्रीपुलादरम्यान अवघ्या २० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागत होते. दरम्यान, जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळवली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.मुंब्रा बायपास सुरू झाल्याने पनवेलमार्गे येणारी वाहतूक कल्याणमार्गे येणे बंद झाले. आग्रा रोड, भिवंडीला जाणारी वाहने येतच असतात. ती मार्गी लावताना सुमारे १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत आहे. त्यातही सुधारणा होईल, असे मत पत्रीपूल वाहतूक नियंत्रण शाखेचे सहपोलीस निरीक्षक जी.व्ही. तांबडे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :mumbraमुंब्रा