शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अपूर्णावस्थेतील मुंब्रा बायपास धोकादायक, रस्त्यावर माती पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 02:40 IST

चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले.

- कुमार बडदेमुंब्रा : चार महिन्यांनंतरही दुरु स्तीची अनेक कामे अपूर्णावस्थेत असताना मुंब्रा बायपास रस्त्याचे (बाह्यवळण रस्ता) राजकीय श्रेयासाठी रविवारी रात्री १२ ते सोमवारी सकाळपर्यंत तीन वेळा तीन पक्षांच्या नेत्यांनी उद्घाटन केले. अपूर्णावस्थेतील एखाद्या रस्त्याचे इतक्या वेळा उद्घाटन करण्याची ही घटना जागतिक विक्रम म्हणून नोंदवला जाण्याची गरज असल्याचे मत या रस्त्यावरून सोमवारी प्रवास केलेल्या प्रवाशांनी व्यक्त केले.या रस्त्यावरील अनेक कामे अपूर्ण आहेत. रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यासाठी रेतीबंदर परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर लावण्यात आलेले लोखंडी पिलर अद्याप काढण्यात आलेले नाहीत. बायपासवरील दुभाजकांची कामे अपूर्ण आहेत. दुभाजकांच्या जागेवर काही ठिकाणी फक्त लोखंडी सळया लावण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी काँक्रिटीकरण ओले असतानाही त्यावरून वाहने गेल्यामुळे खड्डे पडले आहेत. मुंब्रादेवी डोंगराच्या पायथ्याजवळ रस्ता रुंदीकरणासाठी फक्त माती टाकण्यात आली आहे. पुढील काम करून रस्ता तयार करण्यात आलेला नाही. ठाण्याच्या दिशेकडील रस्त्यावर पावसाळ्यात आलेली डोंगरावरील माती ठिकठिकाणी तशीच पसरलेली आहे. यामुळे मुख्य रस्ता अरु ंद झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उंचसखल झाला आहे. त्यावरून वाहने चालवताना हादरे बसत असल्याची चालकांची तक्रार आहे. कामासाठी आणण्यात आलेली अवाढव्य यंत्रे अजूनही बायपासवर असून काम अपूर्ण असल्याची साक्ष देत आहेत. कामासाठी आणण्यात आलेला सिमेंटसदृश भुसा एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडून आहे. जवळून वेगाने वाहने जाताच तो हवेत उडत आहे. परिणामी, रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुरळा उडत आहे. त्यामुळे वाहनचालकाला पुढची वाहने व्यवस्थित दिसत नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत बंदमुळे उद्घाटनानंतरच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरून तुरळक वाहने सुरू होती. त्यामुळे अपूर्णावस्थेतील रस्त्याचे उद्घाटन करण्याचे धोके अजून अनुभवास आलेले नाहीत. घाईघाईने रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्याबद्दल अनेक वाहनचालकांनी ‘लोकमत’कडे आश्चर्य व्यक्त केले. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही केली.>पत्रीपुलावर कोंडी कायमडोंबिवली : मुंब्रा बायपास खुला झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना दिलासा मिळाला. हा रस्ता बंद असल्याने पत्रीपुलादरम्यान अवघ्या २० मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तास कोंडीत अडकावे लागत होते. दरम्यान, जुना पत्रीपूल धोकादायक बनल्याने वाहतूक नवीन पुलावरून वळवली आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे.मुंब्रा बायपास सुरू झाल्याने पनवेलमार्गे येणारी वाहतूक कल्याणमार्गे येणे बंद झाले. आग्रा रोड, भिवंडीला जाणारी वाहने येतच असतात. ती मार्गी लावताना सुमारे १० ते १५ मिनिटांचा अवधी लागत आहे. त्यातही सुधारणा होईल, असे मत पत्रीपूल वाहतूक नियंत्रण शाखेचे सहपोलीस निरीक्षक जी.व्ही. तांबडे यांनी सांगितले. विसर्जन मिरवणुकीसाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :mumbraमुंब्रा