शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला, वाहतूक 15 मिनिटं उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 08:49 IST

मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने  आहे. धुक्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे.

डोंबिवली - मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने  आहे. धुक्यामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. दिवा, कल्याण व बदलापूरदरम्यान दाट धुके आहेत. यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. 

दरम्यान, बुधवारीदेखील मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एरव्ही सामान्य मुंबईकरांना नित्याच्या झालेल्या लेटमार्क प्रवासाचा अनुभव बुधवारी देशभरातील अनुयायींनीदेखील घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या (अप) जलद मार्गावर दिवा स्थानक आणि पारसिक बोगदा या दरम्यान मालगाडीची बोगी घसरली. बुधवारी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी ही घटना घडली. सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी बोगी पुन्हा रुळावर आणण्यात आली. रात्री ७ वाजून ३३ मिनिटांनी अप जलद दिशेकडे पहिली लोकल रवाना झाली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तथापि, महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आलेल्या अनुयायांसह दैनंदिन प्रवाशांना यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर येथे एकत्र आले. संभाव्य गर्दी लक्षात घेता, सोमवार रात्रीपासून अनुयायींनी मुंबईकडे धाव घेतली होती. यामुळे दादर आणि अन्य स्थानकांत गर्दी होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास सुठाणे-नवी मुंबई ट्रान्स-हार्बर मार्गाजवळ मालगाडी घसरली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणा-या जलद मार्गावरील मालगाडी इंजिनपासून ११वी बोगी रेल्वे रुळावरून घसरली. दुर्घटनेमुळे अप जलद मार्गावरील लोकल फेºया अप धिम्या मार्गावर वळविण्यात आल्या. दिवा ते ठाणे या मार्गावर हे बदल करण्यात आले. या घटनेमुळे लोकल ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या. घसरलेली बोगी परत रुळावर आणण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली. दुर्घटनाग्रस्त मालगाडीच्या तीन बोगी मध्य मार्गावर होत्या. यामुळे जलद मार्गावरील लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. यात मेल-एक्स्प्रेसचादेखील समावेश होता. त्यामुळे मध्य रेल्वेसह मेल-एक्स्प्रेसचाही खोळंबा झाला.

 

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेthaneठाणेdombivaliडोंबिवली