शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Video: बारवी धरण भरले! पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने लोकांना दक्षतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 13:35 IST

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत.

ठाणे-  शनिवारी  संध्याकाळी बारवी धरणात ७१.४९ मी. एवढा पाणी साठा होता. धरणातील पाणीसाठयाची उच्चतम उंची ७२.६० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत सुरु असलेले पर्जन्यमान विचारात घेता बारवी धरणात उच्चतम मर्यादेपर्यंत पाण्याची आवक वाढल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारवी व उल्हासनदी काठावरील गांवा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा शनिवारी रात्रीच जारी केला आहे. 

अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व मुरबाड तालुक्यातील बारवी/ उल्हास नदीच्या काठावरील विषेशतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोन्याचा पाडा, चोण, राहटोली तसेच कल्याण तालुक्यातील कांबा, वरप, पावशेपाडा, रायते, म्हारळ, टिटवाळा, नडगांव, कुंदे, आने मिसोळ, वसत शेलवली, मोहने, गाळेगाव, दहागाव, पोई आपटी, मांजर्ली, मानिवल इत्यादी नदीकाठावरील गांवे व शहरातील नागरीकांना याद्वारे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगावू सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी जीवितहानी व वित्त हानी टाळणेसाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. 

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत. या सर्व ग्रामस्थ आणि आश्रमशाळेतील 300 च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची पंचायत झाली आहे, असे व्यवस्थापक साठे सर यांनी नमुद केले. त्यामुळे शासन यंत्रणेने सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत पुरविणे कामी सहकार्य करावे असे आवाहन या परिसरातील ग्रामस्थ श्री महेश जाधव  व प्रवीण जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसfloodपूर