शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Video: बारवी धरण भरले! पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने लोकांना दक्षतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 13:35 IST

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत.

ठाणे-  शनिवारी  संध्याकाळी बारवी धरणात ७१.४९ मी. एवढा पाणी साठा होता. धरणातील पाणीसाठयाची उच्चतम उंची ७२.६० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत सुरु असलेले पर्जन्यमान विचारात घेता बारवी धरणात उच्चतम मर्यादेपर्यंत पाण्याची आवक वाढल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारवी व उल्हासनदी काठावरील गांवा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा शनिवारी रात्रीच जारी केला आहे. 

अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व मुरबाड तालुक्यातील बारवी/ उल्हास नदीच्या काठावरील विषेशतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोन्याचा पाडा, चोण, राहटोली तसेच कल्याण तालुक्यातील कांबा, वरप, पावशेपाडा, रायते, म्हारळ, टिटवाळा, नडगांव, कुंदे, आने मिसोळ, वसत शेलवली, मोहने, गाळेगाव, दहागाव, पोई आपटी, मांजर्ली, मानिवल इत्यादी नदीकाठावरील गांवे व शहरातील नागरीकांना याद्वारे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगावू सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी जीवितहानी व वित्त हानी टाळणेसाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. 

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत. या सर्व ग्रामस्थ आणि आश्रमशाळेतील 300 च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची पंचायत झाली आहे, असे व्यवस्थापक साठे सर यांनी नमुद केले. त्यामुळे शासन यंत्रणेने सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत पुरविणे कामी सहकार्य करावे असे आवाहन या परिसरातील ग्रामस्थ श्री महेश जाधव  व प्रवीण जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसfloodपूर