शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Video: बारवी धरण भरले! पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने लोकांना दक्षतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 13:35 IST

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत.

ठाणे-  शनिवारी  संध्याकाळी बारवी धरणात ७१.४९ मी. एवढा पाणी साठा होता. धरणातील पाणीसाठयाची उच्चतम उंची ७२.६० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत बारवी धरण परिसरात पाऊस होत असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सद्यस्थितीत सुरु असलेले पर्जन्यमान विचारात घेता बारवी धरणात उच्चतम मर्यादेपर्यंत पाण्याची आवक वाढल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारवी व उल्हासनदी काठावरील गांवा सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा शनिवारी रात्रीच जारी केला आहे. 

अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व मुरबाड तालुक्यातील बारवी/ उल्हास नदीच्या काठावरील विषेशतः आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोन्याचा पाडा, चोण, राहटोली तसेच कल्याण तालुक्यातील कांबा, वरप, पावशेपाडा, रायते, म्हारळ, टिटवाळा, नडगांव, कुंदे, आने मिसोळ, वसत शेलवली, मोहने, गाळेगाव, दहागाव, पोई आपटी, मांजर्ली, मानिवल इत्यादी नदीकाठावरील गांवे व शहरातील नागरीकांना याद्वारे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी आगावू सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी जीवितहानी व वित्त हानी टाळणेसाठी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. 

वासींद जवळच्या भातसई गावात 2 ते 3 फूट पाणी भरले असून आश्रमशाळा विद्यार्थी आणि नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ आश्रमशाळा इमारतीत थांबून आहेत. या सर्व ग्रामस्थ आणि आश्रमशाळेतील 300 च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची पंचायत झाली आहे, असे व्यवस्थापक साठे सर यांनी नमुद केले. त्यामुळे शासन यंत्रणेने सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत पुरविणे कामी सहकार्य करावे असे आवाहन या परिसरातील ग्रामस्थ श्री महेश जाधव  व प्रवीण जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसfloodपूर