शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान, ठाणे जिल्ह्यातील १६ हजार १४० शेतकऱ्यांना मिळाला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 01:14 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१, तर इतर बँकांमध्ये ३३९  शेतकऱ्यांचे खाते आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१, तर इतर बँकांमध्ये ३३९  शेतकऱ्यांचे खाते आहे. या १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे गाव, संस्थानिहाय प्राप्त याद्यांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे बँका पीककर्ज वाटपात यंदाही मेहरबान झाल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. या योजनेच्या  पहिल्या दिवशी दोन हजार ८२६ शेतकऱ्यांची खाती आधार लिंक करून त्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रुपये ३  मार्च २०२०ला जमा करण्याचा विक्रम संबंधित प्रशासनाने केला होता. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अल्पावधीतच या योजनेद्वारे दोन लाखांपर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. या कर्ज योजनेमुळे मला ३० हजार रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. या योजनेतून थकीत कर्जमाफ झाल्यामुळे आर्थिक विवंचना दूर झाली. यामुळे शासनाचे आभारी आहोत.     - रवींद्र लुटे, अघई, ता. शहापूर  दरवर्षी प्रामाणिकपणे मी कर्जफेड करीत असतो. ८५ हजारांचे पीककर्ज फेडण्यासाठी मी अन्य व्यक्तींकडून व्याजाने रक्कम घेऊन पीककर्ज भरले आहे; मात्र मला आजपर्यंतही शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ झालेला नाही. हा तर चोर सोडून संन्याशाला फाशी, असा प्रकार आहे.    - हरिचंद्र बागराव, सोगाव,  या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सध्या तरी उपलब्ध नाही.  मात्र, अन्य जिल्ह्याच्या तुलनेत यंदाही ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीककर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे.      - जयानंद भारती, लिड बँक, मॅनेजर, ठाणे या कर्जमाफीच्या रकमेसंबंधी प्राप्त तक्रारी सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर समित्या गठीत केल्या होत्या. या तक्रारींमध्ये अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी अधिक होत्या. त्या संबंधित स्थानिक तहसीलदारांना प्राप्त होताच त्यावर लगेच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य झाले आहे. या योजनेद्वारे चाळीस हजारांचे कर्ज माफ झाल्याचे शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील शेतकरी पांडुरंग धानके यांनी स्पष्ट करून शासनाचे आभार मानले, तर ६५ हजारांचे कर्ज माफ झाल्याचे नायकाचापाडा येथील राम आवार यांनी मान्य केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे