शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

ठाण्यातील रायलादेवी तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:20 IST

केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबोटीचे भगदाड बुजविण्यासाठी घेतली पाण्यात उडीपाण्यात रुतल्याने बुडून मृत्युबोटीतील इतर पाच जण बचावले

ठाणे: कॉलेजला जातो, असे सांगून घरातून सकाळी बाहेर पडलेल्या सहा मित्रांपैकी ऋतिक गणेश कदम (१७, रा. पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याचा रायलादेवी तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बोटीला भगदाड पडल्यामुळे बोटीतील पाणी काढण्याचे भांडेच तलावात पडले. ते काढण्यासाठीच त्याने उडी मारली आणि तो बुडाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.देवेंद्र चंद्रकांत घाडगे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), राज संतोष पवार (१६, रा. किसननगर, ठाणे), ओम अनिल डुंबरे (१६, रा. पडवळनगर, ठाणे), विश्वजित सोमनाथ पोमणे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), आशिष संजीव शिंदे (१७, रा. पडवळनगर, ठाणे) आणि ऋतिक कदम हे ११ वीच्या वर्गात शिकणारे सहा मित्र बुधवारी दुपारी अचानक ठाण्याच्या रायलादेवी तलावातील बोटीतून सफर करण्यासाठी गेले. तलावातून जाण्यासाठी त्यांना बोटीतून जाण्याचा मोह आवरता आला नाही. ज्या बोटीत हे बसले तिला एक लहानसे भगदाड असल्यामुळे ती नादुरुस्त असल्याचे काही स्थानिकांनी त्यांना बजावलेही होते. पण, हौसेखातर त्यांनी बोटीतून सैर करण्याचा आनंद लुटण्याचा इरादा पक्का केला. ते साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास या बोटीतून निघाले. बोट काही अंतरावर गेली असतांनाच बोटीत त्या भगदाडातून पाणी शिरु लागले. ते पाणीही हे मित्र एका डब्याच्या सहाय्याने अगदी मजेने बाहेर काढत होते. अचानक डबा खाली पडला. हाच डबा काढण्यासाठी ऋतिकने कपडे काढून पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने उडीही मारली. पण तो डबा बाहेर काढण्यात अयशस्वी ठरला. गाळात रुतल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. इकडे आपला मित्र बुडाल्याने प्रचंड भेदरलेल्या या मित्रांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाने तासाभराने साधारण ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित पाचही जण या दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरी आपला मित्र गेल्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली. सकाळी कॉलेजला जाऊन येतो, इतकेच घरातून बाहेर पडतांना ऋतिक बोलला होता, असे त्याचे वडील गणेश कदम यांनी सांगितले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे