शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

ठाण्यातील रायलादेवी तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:20 IST

केवळ हौसेखातर तलावात एका नादुरुस्त बोटीतून विहार करणा-या सहा मित्रापैकी एकाच्या जिवावर बेतल्याची घटना ठाण्यातील रायलादेवी तलावात घडली. या घटनेने पडवळनगर भागात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देबोटीचे भगदाड बुजविण्यासाठी घेतली पाण्यात उडीपाण्यात रुतल्याने बुडून मृत्युबोटीतील इतर पाच जण बचावले

ठाणे: कॉलेजला जातो, असे सांगून घरातून सकाळी बाहेर पडलेल्या सहा मित्रांपैकी ऋतिक गणेश कदम (१७, रा. पडवळनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याचा रायलादेवी तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. बोटीला भगदाड पडल्यामुळे बोटीतील पाणी काढण्याचे भांडेच तलावात पडले. ते काढण्यासाठीच त्याने उडी मारली आणि तो बुडाल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.देवेंद्र चंद्रकांत घाडगे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), राज संतोष पवार (१६, रा. किसननगर, ठाणे), ओम अनिल डुंबरे (१६, रा. पडवळनगर, ठाणे), विश्वजित सोमनाथ पोमणे (१७, रा. पडवळनगर, ठाणे), आशिष संजीव शिंदे (१७, रा. पडवळनगर, ठाणे) आणि ऋतिक कदम हे ११ वीच्या वर्गात शिकणारे सहा मित्र बुधवारी दुपारी अचानक ठाण्याच्या रायलादेवी तलावातील बोटीतून सफर करण्यासाठी गेले. तलावातून जाण्यासाठी त्यांना बोटीतून जाण्याचा मोह आवरता आला नाही. ज्या बोटीत हे बसले तिला एक लहानसे भगदाड असल्यामुळे ती नादुरुस्त असल्याचे काही स्थानिकांनी त्यांना बजावलेही होते. पण, हौसेखातर त्यांनी बोटीतून सैर करण्याचा आनंद लुटण्याचा इरादा पक्का केला. ते साधारण २.३० वाजण्याच्या सुमारास या बोटीतून निघाले. बोट काही अंतरावर गेली असतांनाच बोटीत त्या भगदाडातून पाणी शिरु लागले. ते पाणीही हे मित्र एका डब्याच्या सहाय्याने अगदी मजेने बाहेर काढत होते. अचानक डबा खाली पडला. हाच डबा काढण्यासाठी ऋतिकने कपडे काढून पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्याने उडीही मारली. पण तो डबा बाहेर काढण्यात अयशस्वी ठरला. गाळात रुतल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यु झाला. इकडे आपला मित्र बुडाल्याने प्रचंड भेदरलेल्या या मित्रांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अग्निशमन दलाने तासाभराने साधारण ४.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला. उर्वरित पाचही जण या दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरी आपला मित्र गेल्यामुळे त्यांनी हळहळ व्यक्त केली. सकाळी कॉलेजला जाऊन येतो, इतकेच घरातून बाहेर पडतांना ऋतिक बोलला होता, असे त्याचे वडील गणेश कदम यांनी सांगितले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे