शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

वैशालीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या  डॉ. स्रेहल नरवडे निलंबित; तर कंत्राटी अधिपरिचारीका सेवेतून बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:17 IST

उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न

राजू काळे 

भार्इंदर-  उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न झाल्याने त्याला कारणीभूत ठरलेल्या डॉ. स्रेहल नरवडेला यांना आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी निलंबित केले तर कंत्राटी अधिपरिचारीका पल्लवी बंदागळे यांना सेवेतून बडतर्फ केल्याचा आदेश शुक्रवारी काढला.  

मालेगावला आजीकडे राहणारी वैशाली गणेशोत्सवासाठी भार्इंदर येथे राहणा-या आपल्या आई-वडीलांकडे आली होती. १२ सप्टेंबरला तीला अस्वस्थ वाटु लागल्याने ती उपचारार्थ जोशी रुग्णालयात सकाळी ७.३० वाजता पोहोचली. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) तीच्या वैद्यकीय तपासणीनंतर तीला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील मानद सेवा देणा-यी खाजगी डॉक्टरकडून देण्यात आला. तत्पुर्वी तीची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेल्या अहवालात तीच्या लघवीतून रक्ताचा स्त्राव होत असुन रक्तबिंबीका (प्लेटलेटस्) अत्यंत कमी असल्याचे नुमद करण्यात आले होते. तो अहवाल त्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉ. नरवडे यांना तीच्या नातेवाईकांकडुन दाखविण्यात आला. हा आजार जिवितावर बेतणारा असतानाही त्यावर गांभीर्य न दाखविता डॉ. नरवडे यांनी तीला न तपासताच रुग्णालयात दाखल करुन घेतले. तीला दाखल केलेल्या महिला विभागात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारीका पल्लवी बंदागळे यांनी तीच्यावर सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार करुन डॉ. नरवडे यांना उपचारासाठी अनेकदा फोनवरुन संपर्क साधला. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन सायंकाळी ५ नंतर तीची प्रकृती खालावु लागली. त्याची महिती पुन्हा पल्लवी यांनी डॉ. नरवडे यांना दिली. तरीदेखील त्यावर गांभीर्य न दाखविल्याने अखेर सायंकाळी ७ वाजता तीला श्वास घेण्यात त्रास होऊ लागला. त्यामुळे ती अनेकदा पल्लवी यांना मला मोकळ्या हवेत न्या, अशी मागणी करु लागली.  त्याची माहिती पल्लवी यांनी डॉ. नरवडे यांना फोनद्वारे देऊनही त्या तीच्या तपासणीसाठी वॉर्डमध्ये गेल्या नाहीत. त्यातच रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने तीच्या उपचारात अडचण निर्माण झाली असताना तीला ती सुविधा असलेल्या रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. परंतु नरवडे यांनी त्याची दखल न घेतल्याने वैशाली अखेर बेशुद्ध पडली. त्यावेळी मात्र डॉ. नरवडे यांनी तीला तपासून त्वरीत कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तीच्या नातेवाईकांना दिला. त्याऐवजी तीला लगतच्या कस्तुरी मेडीकेअर या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीला मृत घोषित केल्यानंतर पुन्हा तीला जोशी रुग्णालयात आणण्यात आले. यामुळे बिथरलेल्या डॉ. नरवडे यांनी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निखाते यांना पाचारण केले. दरम्यान वैशालीचा मृत्यू हलजर्गीपणामुळेच झाल्याचा आरोप तीच्या नातेवाईकांनी केल्याने आयुक्तांनी पालिकेचे प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चौकशी समिती नियुक्त केली. त्यात डॉ. नरवडे व पल्लवीवर हलगर्जीचा ठपका ठेवण्यात आला. त्याचा अहवाल गुरुवारी आायुक्तांना सादर केल्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी कारवाईचा आदेश काढला. 

टॅग्स :Crimeगुन्हा