शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डाॅ. मेधा खोले आणि त्या अधिका-याला तत्काळ निलंबित करा, आ. जितेंद्र आव्हाड यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 21:17 IST

पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.  असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे, दि. 8 - पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. असा गुन्हा दाखल करणारी खोले आणि गुन्हा दाखल करणारा संबधित पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या पावसात लोकांनी एकमेकांना हात देऊन जीव वाचविले. त्यावेळी कुठेच जात दिसली नव्हती.  त्यावेळी फक्त माणुसकी ही एकच जात दिसली होती. आता या खोलेबाईने जातीपातीची मुळे किती खोलवर गेली आहेत. हे दाखवून दिले आहे. पाच वेळा केलेले जेवण आवडल्यानंतर यादव नावाच्या महिलेला नोकरीवर ठेवले होते. आता अचानक निर्मला यादव हिची जात उघडकीस  आल्याने खोलेबाईचा धर्म भ्रष्ट झाला आहे. यावरून विशिष्ट लोकांच्या मनात जात किती घट्ट आहे, हे दिसत आहे. जे काल पर्यंत जात मानत नाही,  असे बोलत होते. ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करीत असतील तर ते सहन केले जाणार नाही.  तसेच ज्या मुर्ख पोलीस अधिकार्याने हा गुन्हा दाखल केला आहे. त्याची ओळख संबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणूनच त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड  यांनी म्हटले आहे. दरम्यान,  अशा प्रकारचा जातीयवाद  आता महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. आज स्वयंपाक बंदी केली आहे. उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल.; पाणी पिण्यास बंदी घातली जाईल; रस्त्यावर चालण्यास बंदी घातली जाईल.   ऐन केन प्रकारे संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेकडून सुरू आहे. संविधानाने दिलेली समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा डाव आखला जात आहे. पण, संविधानाला जर हात लावला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,  असा इशाराही आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.