शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तीनहात नाक्यावर डबलडेकर उड्डाणपूल

By admin | Updated: April 16, 2016 02:37 IST

शहरातील तीनहात नाक्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने येथे आता डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी येथे अंडरपास काढण्याचा

ठाणे : शहरातील तीनहात नाक्यावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने येथे आता डबलडेकर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी येथे अंडरपास काढण्याचा विचार पालिकेने केला होता. परंतु, आता सध्याच्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलावर आणखी एक पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी २४० कोटींचा खर्च केला जाणार आहे. केंद्राकडून हा निधी उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. परंतु, केंद्राने तो दिलाच नाही तर मात्र महापालिका स्वत: हा पूल उभारेल, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.ठाण्यातील कॅडबरी, नितीन कंपनी आणि तीनहातनाका ही तीन महत्त्वाची जंक्शन्स आहेत. त्यापैकी सर्वाधिक वर्दळ तीनहात नाका परिसरात असते. या जंक्शनवरून मुलुंड एलबीएस मार्ग, मुंबई, नाशिक, घोडबंदर, स्टेशन परिसर अशा विविध ठिकाणी वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे, येथे डबलडेकर ब्रिज उभारण्यात येणार आहे. पालिका अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने या उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला असून आयुक्तांसमोर तो नुकताच सादर करण्यात आला. सध्या तीनहात नाक्यावर पूर्व द्रूतगती मार्गावरून नितीन कंपनी जंक्शनकडे जाणारा एक उड्डाणपूल आहे. त्याला एलबीएसवरून आणखी एक उड्डाणपूल जोडला जाणार आहे. त्या जोड उड्डाणपुलाहून दमानी इस्टेट आणि गोखले रोडवर जाण्यासाठी दोन मार्गिका असतील. तसेच नितीन जंक्शनहून एलबीएसकडे जाण्यासाठी आणि एलबीएसहून नितीन जंक्शनकडे जाण्यासाठीसुद्धा या उड्डाणपुलाचा वापर करता येईल. या जोड उड्डाणपुलाचा वापर शहरांतर्गत वाहतुकीसाठी केला जाईल. तर, या महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी जुन्या उड्डाणपुलावर आणखी एक नवा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. कोपरी, आनंदनगरपासून हा उड्डाणपूल सुरू होणार आहे. तीनहात नाक्यावरील कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सध्या ३२५ सेकंद लागतात. नव्या पुलामुळे हा वेळ वाचेल आणि कोंडीही कमी होईल, असा दावा पालिकेने केला आहे. तीनहात नाक्यावरील कोंडीतून मार्ग काढण्यासाठी सध्या ३२५ सेकंद लागतात. डबलडेकर उड्डाणपुलामुळे येथील वाहतूक तीन टप्प्यांत विभागली जाणार आहे. त्यामुळे सिग्नलचावेळ ३४ सेकंद इतका कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी वाहनचालकांचा वेळ आणि इंधनात मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा दावा पालिकेने केला आहे. या योजनेसाठी केंद्रीय दळणवळण विभागाच्या वतीने अर्थसाहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे त्याबाबत विनंती केली जाणार असून तिथे यश आले नाही तर केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी मिळवण्याचे प्रयत्न होतील. दोन्ही पर्याय यशस्वी झाले नाहीत तर पालिका स्वखर्चाने हे उड्डाणपूल उभारेल.- संजीव जयस्वाल, आयुक्त, ठाणे महानगरपालिका