शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"...तोपर्यंत कल्याण-शीळ महामार्गावरील टोल घेऊ नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:22 IST

कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो.

डोंबिवली:  कल्याण-शीळ रस्त्याचे काम पूर्ण होऊन, निळजे येथील नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत सदर रस्त्यावरील काटई येथील टोल नाका बंद करणे बाबत आमदार प्रमोद पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी पत्र दिले आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. सध्या कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू असून बहुतांश ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह इतरही प्रवाशांना कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. या रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या व   काम सुरू असल्याने  नेहमीच वाहतूक कोंडी असते.

वास्तविक रस्त्याचे काम सुरू असेपर्यंत हा टोल नाका बंद करून टोल वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकावी अशी मागणी पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये केली होती. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थिती पाहता निळजे येथील पूल धोकादायक झाल्याने अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदीच घालण्यात आली असून टोल नाक्याची व यंत्रणेची सध्या तरी गरज नाही. तसेच टोल नाका बंद झाल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊन,  कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करण्यासाठी हा टोल नाका बंद करून, उभारण्यात आलेली यंत्रणा तातडीने काढून टाकण्याची गरज आहे.

तरी पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून प्रवाशांच्या सोयीसाठी व कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने  होण्यासाठी काटई येथील टोल नाका बंद करावा. तसेच निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करणे शक्य होण्यासाठी टोल नाक्यासाठी उभारण्यात आलेली या यंत्रणा काढून टाकण्याचे संभंधितांना आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

टॅग्स :thaneठाणे