शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

डोंबिवलीचे आधारकार्ड केंद्र सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 5:47 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. नागरि सुविधांचे राजकारण करु नका असे सांगत त्यांनी महापालिका अधिका-यांना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे शिवसेना आली भाजपाच्या मदतीला धावून नागरि सुविधांचे राजकारण करु नये - राजेश मोरे

डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या उपविभागीय इमारतीमधील आधारकार्ड केंद्र गुरुवारी बंद पडले. ते पुन्हा सुरु व्हावे नागरिकांची आबाळ दूर व्हावी यासाठी ते आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. नागरि सुविधांचे राजकारण करु नका असे सांगत त्यांनी महापालिका अधिका-यांना तात्काळ सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यानूसार त्यांनी तातडीने ते केंद्र सुरु करण्यासाठी पुढाकार घेत संबंधित अधिका-यांशी चर्चा करत केंद्र चालवणा-या कौस्तुभ डोंगरे यांस नागरिकांसाठी सेवा सुरु करण्याचा आग्रह धरला.कोणीही टिकाटीपण्णी करत असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करुन हे केंद्र तातडीने सुरु करावे. टोकन पद्धती हीमहापालिकेतच सुरु राहणार असून त्यासाठी नागरिकांनी अन्यत्र जाण्याची गरज नाही. महापालिकेतच पहिल्या मजल्यावर टोकन दिले जाईल, जेणेकरुन आधारकार्ड सुविधा मिळवतांना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी महापालिकेनेच घ्यायला हवी असा पवित्रा मोरेंनी घेतला. तसेच आजच्या आजच ही सुविधा सुुरु व्हावी, केंद्र चालवणा-या डोंगरे यांस नाहक कोणी त्रास देऊ नये असे आवाहन मोरेंनी केले. आधारकार्ड केंद्र ही सुविधा आवश्यक असून नागरिकांच्या भावनांशी कोणीही खेळू नये. नागरिकांना त्रास होता कामा नये. सर्वसामान्य माणसांच्या पाठीशी शिवसेना कायम उभी राहणार असल्याचेही ते म्हणाले.त्यानूसार मोरेंनी महापालिकेच्या कल्याण येथिल मुख्यलायात जाऊन आधारकार्ड केंद्र तातडीने सुरु करण्यासंदर्भात हालचाली केल्या. शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास बंद पडलेले केंद्र पुन्हा सुरु करण्यात आल्याचे मोरे म्हणाले. आता केंद्र बंद पडणार नाही, उलट येथे आधारकार्डची सुविधा देणारी यंत्र, त्यासाठीचे कुशल कामगार आदींसह अन्य तांत्रिक बाबी जास्तीत जास्त संख्येने कशा वाढवता येतील यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. नागरिकांच्या सुविधेत कोणीही राजकारण आणू नये असे आवाहन मोरेंनी करत शुभारंभ कोणी केला हे बघण्यापेक्षा त्या सुविधेत सातत्य कसे राहील, नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशी मिळेल याकडेही यंत्रणांनी लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.* या आधारकार्ड केंद्राचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर वीस दिवस ते सुरु होते, परंतू प्रचंड गर्दीमुळे महापालिकेच्या कारभारावर परिणाम होऊ शकतो यासाठी नागरिकांनी राज्यमंत्र्यांच्या सावरकररोड येथिल कार्यालयानजीक जावून टोकन घ्यावे असा फतवा केंद्रचालकाने काढला. त्यास विरोध झाला, आणि त्यामुळे केंद्र गुरुवारी बंद ठेवावे लागले. पण शुक्रवारी तातडीने त्याची दखल घेत मोरेंनी केंद्र सुरुच ठेवावे, बंद ठेवणे योग्य नाही असा पवित्रा घेत ते पुन्हा सुरु केले. यासगळया नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना भाजपाच्या मदतील धावून आल्याची चर्चा सुरु होती. तसेच या सुविधेचे कोणी राजकारण करु नये असेही मोरे म्हणाले यावरुन त्यांनी नकळतपणे भाजपाला टोला लगावल्याचीची महापालिका वर्तूळात चर्चा सुरु होती.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली