शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:39 IST

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात.

डोंबिवली- आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. त्यामुळे चांगले काय आहे याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम आहे. माझी पॅथी चांगली असे प्रत्येक डॉक्टर बोलत असतो. त्यांनी या वादात न पडता एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे आहे तेव्हाच रु ग्णाचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यीक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली टिळक चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र प्रसाद मार्ग, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड या मार्गी फिरून आप्पा दातार चौकात तिचा समारोप झाला. मैत्री व्हाट्स अॅप गुपच्या महिलांनी कॅन्सर जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. फिनिक्सचे मनोगत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा आयुष्यात उभ्या राहिलेल्या महिलांनी आपले अनुभव यात मांडले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजिंदर सिंग, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. मंगेश देशापांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, कॅन्सर हा रोग खेकडय़ासारखा दोन्ही बाजूने जखडणारा आहे. जंकफूड खाऊ नये असे आपण इतरांना सांगतो पण आपण ही तसे वागतो का यांचा विचार केला पाहिजे. जे काम चांगले चालते त्याठिकाणी देवांचे अधिष्ठान असते. लोकांना चांगल्या प्रसंगात देवाची आठवण होत नाही मात्र दुखाचा डोंगर कोसळल्यावर मीच का असा प्रश्न त्यांना पडतो. देवाची आठवण दुखात होते हे ही काही कमी नाही. 

संकट आल्यावर माणूस खचतो त्यातून त्यांना उभारी मिळणो गरजेचे आहे. मैत्री ग्रुप क र्करोगांनी जखडलेल्या माणसाला त्यातून उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. हेरूर यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. त्यांना आपण समाजाचे देणो लागतो याची जाणीव आहे. ते उत्तम काम करीत आहे. त्यांच्या चांगल्या कामाला आपणही हात पुढे करायचा असतो. मैत्री ग्रुपने जे पथनाटय सादर केल्या त्यात त्यानी तंबाखू, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये असा संदेश दिला. याशिवाय जंकफूडपासून लांब राहण्याचा सल्ला ही दिला. मात्र स्त्रियांनी काय करावे हे सांगितले नाही.

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत ‘लढा कॅन्सर  मु्क्तीचा या रे या सारे या, गजाननाला आळवुया, जन मनाला समजावू या मिळूनी सारे लढवू या कर्करोगाला पळवू या आणि तंबाखू, सिगारेट, दारूच्या जाणार नाही वाटेला स्वस्थ ठेवू या आपल्या तन मन धनाला’ यासारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

डॉ. हेरूर म्हणाले, कर्करोगाचे लवकर निदान म्हणजेच जीवदान आहे. त्यांची दहा लक्षणो आहेत. ही लक्षणो दिल्यास त्वरीत तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये एखादी न भरून येणारी जखम, रक्तस्त्रव होणो, न दुखणारी गाठ, अन्न गिळताना त्रस होणो, मल-मूत्र विसजर्नात बदल, तीळ वा चामखीळीचा आकारात बदल, दीर्घकाळ खोकला आणि आवाजात बदल, अकारण थकवा, वजनात घट, सतत पोटात वा अस्वस्थ वाटणो, अकारण ताप ही लक्षणो आहेत. सरकार सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे समाजाने ही थोडीफार जबाबदारी घेण्याची गरज आहे. रूग्णसेवा ही देवापेक्षा ही मोठी सेवा आहे.

टॅग्स :thaneठाणेdocterडॉक्टर