शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:39 IST

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात.

डोंबिवली- आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. त्यामुळे चांगले काय आहे याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम आहे. माझी पॅथी चांगली असे प्रत्येक डॉक्टर बोलत असतो. त्यांनी या वादात न पडता एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे आहे तेव्हाच रु ग्णाचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यीक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली टिळक चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र प्रसाद मार्ग, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड या मार्गी फिरून आप्पा दातार चौकात तिचा समारोप झाला. मैत्री व्हाट्स अॅप गुपच्या महिलांनी कॅन्सर जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. फिनिक्सचे मनोगत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा आयुष्यात उभ्या राहिलेल्या महिलांनी आपले अनुभव यात मांडले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजिंदर सिंग, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. मंगेश देशापांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, कॅन्सर हा रोग खेकडय़ासारखा दोन्ही बाजूने जखडणारा आहे. जंकफूड खाऊ नये असे आपण इतरांना सांगतो पण आपण ही तसे वागतो का यांचा विचार केला पाहिजे. जे काम चांगले चालते त्याठिकाणी देवांचे अधिष्ठान असते. लोकांना चांगल्या प्रसंगात देवाची आठवण होत नाही मात्र दुखाचा डोंगर कोसळल्यावर मीच का असा प्रश्न त्यांना पडतो. देवाची आठवण दुखात होते हे ही काही कमी नाही. 

संकट आल्यावर माणूस खचतो त्यातून त्यांना उभारी मिळणो गरजेचे आहे. मैत्री ग्रुप क र्करोगांनी जखडलेल्या माणसाला त्यातून उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. हेरूर यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. त्यांना आपण समाजाचे देणो लागतो याची जाणीव आहे. ते उत्तम काम करीत आहे. त्यांच्या चांगल्या कामाला आपणही हात पुढे करायचा असतो. मैत्री ग्रुपने जे पथनाटय सादर केल्या त्यात त्यानी तंबाखू, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये असा संदेश दिला. याशिवाय जंकफूडपासून लांब राहण्याचा सल्ला ही दिला. मात्र स्त्रियांनी काय करावे हे सांगितले नाही.

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत ‘लढा कॅन्सर  मु्क्तीचा या रे या सारे या, गजाननाला आळवुया, जन मनाला समजावू या मिळूनी सारे लढवू या कर्करोगाला पळवू या आणि तंबाखू, सिगारेट, दारूच्या जाणार नाही वाटेला स्वस्थ ठेवू या आपल्या तन मन धनाला’ यासारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

डॉ. हेरूर म्हणाले, कर्करोगाचे लवकर निदान म्हणजेच जीवदान आहे. त्यांची दहा लक्षणो आहेत. ही लक्षणो दिल्यास त्वरीत तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये एखादी न भरून येणारी जखम, रक्तस्त्रव होणो, न दुखणारी गाठ, अन्न गिळताना त्रस होणो, मल-मूत्र विसजर्नात बदल, तीळ वा चामखीळीचा आकारात बदल, दीर्घकाळ खोकला आणि आवाजात बदल, अकारण थकवा, वजनात घट, सतत पोटात वा अस्वस्थ वाटणो, अकारण ताप ही लक्षणो आहेत. सरकार सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे समाजाने ही थोडीफार जबाबदारी घेण्याची गरज आहे. रूग्णसेवा ही देवापेक्षा ही मोठी सेवा आहे.

टॅग्स :thaneठाणेdocterडॉक्टर