शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:39 IST

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात.

डोंबिवली- आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. त्यामुळे चांगले काय आहे याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम आहे. माझी पॅथी चांगली असे प्रत्येक डॉक्टर बोलत असतो. त्यांनी या वादात न पडता एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे आहे तेव्हाच रु ग्णाचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यीक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली टिळक चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र प्रसाद मार्ग, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड या मार्गी फिरून आप्पा दातार चौकात तिचा समारोप झाला. मैत्री व्हाट्स अॅप गुपच्या महिलांनी कॅन्सर जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. फिनिक्सचे मनोगत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा आयुष्यात उभ्या राहिलेल्या महिलांनी आपले अनुभव यात मांडले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजिंदर सिंग, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. मंगेश देशापांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, कॅन्सर हा रोग खेकडय़ासारखा दोन्ही बाजूने जखडणारा आहे. जंकफूड खाऊ नये असे आपण इतरांना सांगतो पण आपण ही तसे वागतो का यांचा विचार केला पाहिजे. जे काम चांगले चालते त्याठिकाणी देवांचे अधिष्ठान असते. लोकांना चांगल्या प्रसंगात देवाची आठवण होत नाही मात्र दुखाचा डोंगर कोसळल्यावर मीच का असा प्रश्न त्यांना पडतो. देवाची आठवण दुखात होते हे ही काही कमी नाही. 

संकट आल्यावर माणूस खचतो त्यातून त्यांना उभारी मिळणो गरजेचे आहे. मैत्री ग्रुप क र्करोगांनी जखडलेल्या माणसाला त्यातून उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. हेरूर यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. त्यांना आपण समाजाचे देणो लागतो याची जाणीव आहे. ते उत्तम काम करीत आहे. त्यांच्या चांगल्या कामाला आपणही हात पुढे करायचा असतो. मैत्री ग्रुपने जे पथनाटय सादर केल्या त्यात त्यानी तंबाखू, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये असा संदेश दिला. याशिवाय जंकफूडपासून लांब राहण्याचा सल्ला ही दिला. मात्र स्त्रियांनी काय करावे हे सांगितले नाही.

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत ‘लढा कॅन्सर  मु्क्तीचा या रे या सारे या, गजाननाला आळवुया, जन मनाला समजावू या मिळूनी सारे लढवू या कर्करोगाला पळवू या आणि तंबाखू, सिगारेट, दारूच्या जाणार नाही वाटेला स्वस्थ ठेवू या आपल्या तन मन धनाला’ यासारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

डॉ. हेरूर म्हणाले, कर्करोगाचे लवकर निदान म्हणजेच जीवदान आहे. त्यांची दहा लक्षणो आहेत. ही लक्षणो दिल्यास त्वरीत तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये एखादी न भरून येणारी जखम, रक्तस्त्रव होणो, न दुखणारी गाठ, अन्न गिळताना त्रस होणो, मल-मूत्र विसजर्नात बदल, तीळ वा चामखीळीचा आकारात बदल, दीर्घकाळ खोकला आणि आवाजात बदल, अकारण थकवा, वजनात घट, सतत पोटात वा अस्वस्थ वाटणो, अकारण ताप ही लक्षणो आहेत. सरकार सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे समाजाने ही थोडीफार जबाबदारी घेण्याची गरज आहे. रूग्णसेवा ही देवापेक्षा ही मोठी सेवा आहे.

टॅग्स :thaneठाणेdocterडॉक्टर