शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विविध पॅथीच्या डॉक्टरांनी वादात न पडता एकत्र येऊन रूग्णाचे कल्याण करावे- सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:39 IST

आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात.

डोंबिवली- आपल्याकडे प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. अन्नधान्य आणि भाजीपाल्यावर रासायनिक द्रव्य फ वारली जातात. त्यामुळे चांगले काय आहे याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम आहे. माझी पॅथी चांगली असे प्रत्येक डॉक्टर बोलत असतो. त्यांनी या वादात न पडता एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायला हवे आहे तेव्हाच रु ग्णाचे कल्याण होईल, असे मत ज्येष्ठ साहित्यीक सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कॅन्सरच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली टिळक चौक येथून सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र प्रसाद मार्ग, चार रस्ता, मानपाडा रोड, बाजीप्रभू चौक, फडके रोड या मार्गी फिरून आप्पा दातार चौकात तिचा समारोप झाला. मैत्री व्हाट्स अॅप गुपच्या महिलांनी कॅन्सर जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले. फिनिक्सचे मनोगत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर मात करून पुन्हा आयुष्यात उभ्या राहिलेल्या महिलांनी आपले अनुभव यात मांडले आहे. यावेळी व्यासपीठावर डॉ. तेजिंदर सिंग, कर्करोगतज्ञ डॉ. अनिल हेरूर, डॉ. मंगेश देशापांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, कॅन्सर हा रोग खेकडय़ासारखा दोन्ही बाजूने जखडणारा आहे. जंकफूड खाऊ नये असे आपण इतरांना सांगतो पण आपण ही तसे वागतो का यांचा विचार केला पाहिजे. जे काम चांगले चालते त्याठिकाणी देवांचे अधिष्ठान असते. लोकांना चांगल्या प्रसंगात देवाची आठवण होत नाही मात्र दुखाचा डोंगर कोसळल्यावर मीच का असा प्रश्न त्यांना पडतो. देवाची आठवण दुखात होते हे ही काही कमी नाही. 

संकट आल्यावर माणूस खचतो त्यातून त्यांना उभारी मिळणो गरजेचे आहे. मैत्री ग्रुप क र्करोगांनी जखडलेल्या माणसाला त्यातून उभारी देण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. हेरूर यांच्यासारखी माणसे समाजात आहेत. त्यांना आपण समाजाचे देणो लागतो याची जाणीव आहे. ते उत्तम काम करीत आहे. त्यांच्या चांगल्या कामाला आपणही हात पुढे करायचा असतो. मैत्री ग्रुपने जे पथनाटय सादर केल्या त्यात त्यानी तंबाखू, सिगारेट, दारू यांचे सेवन करू नये असा संदेश दिला. याशिवाय जंकफूडपासून लांब राहण्याचा सल्ला ही दिला. मात्र स्त्रियांनी काय करावे हे सांगितले नाही.

कर्करोगाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत ‘लढा कॅन्सर  मु्क्तीचा या रे या सारे या, गजाननाला आळवुया, जन मनाला समजावू या मिळूनी सारे लढवू या कर्करोगाला पळवू या आणि तंबाखू, सिगारेट, दारूच्या जाणार नाही वाटेला स्वस्थ ठेवू या आपल्या तन मन धनाला’ यासारख्या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.

डॉ. हेरूर म्हणाले, कर्करोगाचे लवकर निदान म्हणजेच जीवदान आहे. त्यांची दहा लक्षणो आहेत. ही लक्षणो दिल्यास त्वरीत तपासणी केली पाहिजे. त्यामध्ये एखादी न भरून येणारी जखम, रक्तस्त्रव होणो, न दुखणारी गाठ, अन्न गिळताना त्रस होणो, मल-मूत्र विसजर्नात बदल, तीळ वा चामखीळीचा आकारात बदल, दीर्घकाळ खोकला आणि आवाजात बदल, अकारण थकवा, वजनात घट, सतत पोटात वा अस्वस्थ वाटणो, अकारण ताप ही लक्षणो आहेत. सरकार सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे समाजाने ही थोडीफार जबाबदारी घेण्याची गरज आहे. रूग्णसेवा ही देवापेक्षा ही मोठी सेवा आहे.

टॅग्स :thaneठाणेdocterडॉक्टर