शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:42 IST

- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली जात नाही. शहीद कॅप्टन विनय सच्चान यांचे वडील राजाबेटा सच्चान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला ही खंत व्यक्त केली.मुळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ...

- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली जात नाही. शहीद कॅप्टन विनय सच्चान यांचे वडील राजाबेटा सच्चान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला ही खंत व्यक्त केली.मुळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील सच्चान कुटुंबिय १९९० पासून डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असलेल्या या कुटुंबातील २६ वर्षीय विनय यांना २४ मार्च २००३ रोजी जम्मु-काश्मीरातील राजौरी सेक्टरमधील सुरणकोट भागात दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावताना वीरमरण आले. कुटुंबातील अन्य कुणीही लष्करात नसले तरी, विनय यांना देशप्रेमाची कमालीची ओढ होती. यातूनच ११ जून १९९८ रोजी ते सैन्यदलात रूजू झाले. त्यांनी ५ मराठा लाइट इन्फ्रँ टपासून लष्करी सेवेला सुरूवात केली. १९९९ साली कारगिल युध्द सुरू असताना विनय डेहराडून येथे लेफ्टनंटचे ट्रेनिंग घेत होते. २००२ अखेरीस त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि मार्च २००३ मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.या घटनेला १५ वर्षे उलटली असली तरी कॅप्टन विनय यांच्या स्मृती स्फूर्तीस्थळाच्या माध्यमातून आजही जपल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांचे वडील राजाबेटा आणि आई सुधा यांनी त्यांच्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. लष्करातील प्रत्येक सैनिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. तशीच देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या जवानांकडून आजही आमची खबरबात विचारली जाते. माझी मुलगी पल्लवी हिला भाऊ नाही; पण सैनिकांना राखी पाठवून तिने आपले बंधूप्रेम कायम ठेवल्याचे राजाबेटा यांनी सांगितले. कॅप्टन विनयच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक हे प्रेरणादायी आहे. या स्फुर्तीस्थळाच्या उभारणीत दिवंगत नगरसेवक नंदू जोशी यांचे मोलाचे योगदान आहे. केडीएमसी प्रशासन आणि तत्कालीन पदाधिकाºयांचीही यासाठी चांगली मदत झाली होती. दरवर्षी २४ मार्च रोजी विनय यांच्या स्मृतीदिनी मुंबई सिध्दार्थ महाविद्यालयातील नेव्हल एनसीसी युनीटचे विद्यार्थी या स्फूर्तीस्थळावर मानवंदना देत असल्याचेही राजाबेटा यांनी यावेळी सांगितले.घर सामाजिक उपक्रमासाठी देणारडोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात सच्चान कुटुंबाचे वास्तव्य असून, त्यांचे घर एक प्रकारचे स्मारक झाले आहे. विनयच्या आठवणी जतन करण्यासाठी आपल्या पश्चात हे घर सामाजिक उपक्रमांसाठी देण्याचा मानस या कुटुंबाने व्यक्त केला. एखादी लायब्ररी अथवा सैन्यदलाशी संबंधित उपक्रम या घरामध्ये सामान्य नागरीकांसाठी चालू करण्याचा विचार असल्याचे राजाबेटा यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnewsबातम्या