शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

केवळ सन्मान नकोत, आस्थेने विचारपूसही हवी! शहीद जवानांच्या कुटुंबियांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:42 IST

- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली जात नाही. शहीद कॅप्टन विनय सच्चान यांचे वडील राजाबेटा सच्चान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला ही खंत व्यक्त केली.मुळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील ...

- प्रशांत मानेडोंबिवली: देशासाठी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचे ठिकठिकाणी सन्मान होतात; मात्र ते स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनापुरतेच सिमीत असतात. एरव्ही देशासाठी बलिदान केलेल्या या जवानांच्या कुटुंबियांची आस्थेने विचारपूसही केली जात नाही. शहीद कॅप्टन विनय सच्चान यांचे वडील राजाबेटा सच्चान यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला ही खंत व्यक्त केली.मुळचे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील सच्चान कुटुंबिय १९९० पासून डोंबिवलीत वास्तव्याला आहेत. भारतीय लष्करात कॅप्टन पदावर असलेल्या या कुटुंबातील २६ वर्षीय विनय यांना २४ मार्च २००३ रोजी जम्मु-काश्मीरातील राजौरी सेक्टरमधील सुरणकोट भागात दहशतवाद्यांचा हल्ला परतवून लावताना वीरमरण आले. कुटुंबातील अन्य कुणीही लष्करात नसले तरी, विनय यांना देशप्रेमाची कमालीची ओढ होती. यातूनच ११ जून १९९८ रोजी ते सैन्यदलात रूजू झाले. त्यांनी ५ मराठा लाइट इन्फ्रँ टपासून लष्करी सेवेला सुरूवात केली. १९९९ साली कारगिल युध्द सुरू असताना विनय डेहराडून येथे लेफ्टनंटचे ट्रेनिंग घेत होते. २००२ अखेरीस त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि मार्च २००३ मध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षे होते.या घटनेला १५ वर्षे उलटली असली तरी कॅप्टन विनय यांच्या स्मृती स्फूर्तीस्थळाच्या माध्यमातून आजही जपल्या गेल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांचे वडील राजाबेटा आणि आई सुधा यांनी त्यांच्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. लष्करातील प्रत्येक सैनिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. तशीच देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली पाहिजे. सीमेवर लढणाऱ्या जवानांकडून आजही आमची खबरबात विचारली जाते. माझी मुलगी पल्लवी हिला भाऊ नाही; पण सैनिकांना राखी पाठवून तिने आपले बंधूप्रेम कायम ठेवल्याचे राजाबेटा यांनी सांगितले. कॅप्टन विनयच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक हे प्रेरणादायी आहे. या स्फुर्तीस्थळाच्या उभारणीत दिवंगत नगरसेवक नंदू जोशी यांचे मोलाचे योगदान आहे. केडीएमसी प्रशासन आणि तत्कालीन पदाधिकाºयांचीही यासाठी चांगली मदत झाली होती. दरवर्षी २४ मार्च रोजी विनय यांच्या स्मृतीदिनी मुंबई सिध्दार्थ महाविद्यालयातील नेव्हल एनसीसी युनीटचे विद्यार्थी या स्फूर्तीस्थळावर मानवंदना देत असल्याचेही राजाबेटा यांनी यावेळी सांगितले.घर सामाजिक उपक्रमासाठी देणारडोंबिवली येथील एमआयडीसी परिसरात सच्चान कुटुंबाचे वास्तव्य असून, त्यांचे घर एक प्रकारचे स्मारक झाले आहे. विनयच्या आठवणी जतन करण्यासाठी आपल्या पश्चात हे घर सामाजिक उपक्रमांसाठी देण्याचा मानस या कुटुंबाने व्यक्त केला. एखादी लायब्ररी अथवा सैन्यदलाशी संबंधित उपक्रम या घरामध्ये सामान्य नागरीकांसाठी चालू करण्याचा विचार असल्याचे राजाबेटा यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानnewsबातम्या