शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

तोंडी सांगू नका प्रतिज्ञापत्र द्या!, हरीत लवादानेही ठोठावला होता दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:20 IST

डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील रासायनिक कारखान्यातून होत असलेले प्रदूषण रोखण्याकरिता काय केले ते तोंडी सांगू नका तर याबाबत येत्या ६ आॅक्टोबर पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करा, अशा शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली.

डोंबिवली : डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील रासायनिक कारखान्यातून होत असलेले प्रदूषण रोखण्याकरिता काय केले ते तोंडी सांगू नका तर याबाबत येत्या ६ आॅक्टोबर पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करा, अशा शब्दांत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची खरडपट्टी काढली.उल्हास व वालधूनी नदीसह कल्याण खाडी प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आत्तापर्यंत काय केले व पुढे काय करणार आहे, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्यावतीने सुनावणीला उपस्थित असलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांना केला. त्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी काय केले व पुढे काय करणार आहोत. त्याची लिखित स्वरुपात माहिती आणली नव्हती. त्यांनी तोंडी स्वरुपात प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असून प्रदूषण बºयापैकी कमी झाले असल्याचे स्पष्ट केले. त्याला ‘वनशक्ती’ने हरकत घेतली. प्रदूषण कमी झालेले नसून दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती दिली जात असल्याचा मुद्दा मांडला. प्रधान सचिव व सदस्य सचिवांनी आयआयटी व निरीशी चर्चा करुन कृती आराखडा तयार करायचा होता. तो त्यांनी केलेलाच नसल्याचे ‘वनशक्ती’चे म्हणणे होते. तर आयआयटी व निरीशी चर्चा करुन काम सुरु असल्याचे सरकारने नमूद केले. प्रदूषण रोखण्यासाठी काय केले व यापुढे काय करणार आहोत याचे प्रतिज्ञापत्र ६ आॅक्टोबरच्या आत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले व ६ आॅक्टोबर रोजीच पुढील सुनावणी होईल असे स्पष्ट केले आहे.‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेने राष्ट्रीय हरीत लवादाकडे याचिका दाखल केली आहे.ही याचिका न्यायप्रविष्ट असून लवादाने प्रदूषण केल्याबद्दल कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका, औद्योगिक विकास महामंडळ व डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर सांडपाणी प्रक्रिया केंद्राना एकूण ९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ही स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने रद्द करुन लवादाचा निकाल कायम ठेवला. तसेच सर्व संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्याची मुदत दिली होती.>प्रधान सचिव व सदस्य सचिवांनी निरी, आयआयटी आणि ओशनोग्राफीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे आदेश यापूर्वी हरीत लवादाने दिले आहेत. सांडपाणी प्रक्रिया पुरेशा गांभीर्याने होत नसल्याने या केंद्राला लवादाने ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यापूर्वी वेगवेगळ््या महापालिका, नगरपालिका आणि यंत्रणांनाही १०० कोटींचा दंड ठोठावला होता.