शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

मीरा-भार्इंदरमधील खड्डे बुजवा नाहीतर वाहने सावकाश चालवा, अशी फलकबाजी करा, मनविसेचे थेट परिवहन आयुक्तांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:37 IST

मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने

 - राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) मीरा-भार्इंदर शहर सचिव शान पवार यांनी थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाच लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. 

शहरात पावसाळी खड्यांचे कारण पुढे करुन पाऊस थांबल्यासच खड्डे कायमस्वरुपी दुरुस्त केले जातील, असे सबुरीचे आश्वासन पालिका अधिकारी प्रत्येक खड्यांच्या तक्रारीवर देतात. तक्रारदार अथवा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला खड्डे दुरुस्तीचे अल्टिमेटम दिल्यास त्या दरम्यान प्रशासनाकडुन खड्डे दुरुस्तीची मोहिम सुरु केली जाते. परंतु, ती देखील तात्पुरत्या स्वरुपाची. खड्यांत डांबरयुक्त खडी टाकुन तात्पुरती दुरुस्ती उरकली जाते. हि दुरुस्ती काही दिवसांतच पुन्हा उखडुन खड्डे जैसे ते होतात. अथवा खड्यांचा आकार मोठा होऊन वाहनचालकांच्या डोकेदुखीत भर पडते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढुन अवयवांची दुखणी डोके वर काढतात. शहरात सर्वात जास्त अपघात खड्यांमुळेच होत असल्याचा दावा करीत पवार यांनी आजही शहरातील अनेक वाहतुक रस्त्यांवर खड्यांचे साम्रज्य पसरले असतानाही त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ नसल्याचा आरोप केला आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच त्यावर थातुरमातूर कार्यवाही करुन तक्रारदारांचे समाधान करण्याचा कारभार पालिकेने सुरु केला आहे. रस्त्यांचे बांधकाम टक्केवारीमुळे निकृष्टदर्जाचे होत असल्यानेच अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचा दावा करीत मनविसेचे शहर सचिव पवार यांनी खड्यांच्या कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे ठोस पर्याय नसल्यास त्यांनी किमान रस्त्यांवरील खड्यांपुर्वी फलके लावुन त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, असा उल्लेख असलेली फलके लावण्याची उपहासात्मक मागणी थेट परिवहन आयुक्तांकडे केली आहे. यामुळे पुढे खड्डे असल्याची खात्री होऊन वाहनचालक वाहने सावकाश चालवुन संभाव्य अपघातापासुन वाचु शकतो, असा कयास लावण्यात आला आहे. त्याचे निवेदन त्यांनी परिवहन आयुक्तांसह स्थानिक वाहतुक शाखेचे वरीष्ठ निरीक्षक जगदिश शिंदे यांना दिले. यावेळी मनविसेचे महेश वाघमारे, अक्षय पिसे, साई परब, विश्वास गवस, तृणाल व्हटकर, गणेश बामणे, वैभव ओझा, महेश चव्हाण आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :mira roadमीरा रोड