शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मीरा-भार्इंदरमधील खड्डे बुजवा नाहीतर वाहने सावकाश चालवा, अशी फलकबाजी करा, मनविसेचे थेट परिवहन आयुक्तांना साकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 16:37 IST

मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने

 - राजू काळे  

भार्इंदर - मीरा-भार्इंदरमध्ये खड्डयांचे साम्राज्य नित्याची बाब झाली असुन अनेकदा ते बुजविण्याची तात्पुरती मलमपट्टी प्रशासनाकडून केली जाते. यानंतर पुन्हा खड्डयांची मालिका सुरू असल्याने अखेर त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, अशा आशयाची फलके लावण्याची उपहासात्मक पर्याय शोधुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) मीरा-भार्इंदर शहर सचिव शान पवार यांनी थेट परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनाच लेखी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. 

शहरात पावसाळी खड्यांचे कारण पुढे करुन पाऊस थांबल्यासच खड्डे कायमस्वरुपी दुरुस्त केले जातील, असे सबुरीचे आश्वासन पालिका अधिकारी प्रत्येक खड्यांच्या तक्रारीवर देतात. तक्रारदार अथवा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला खड्डे दुरुस्तीचे अल्टिमेटम दिल्यास त्या दरम्यान प्रशासनाकडुन खड्डे दुरुस्तीची मोहिम सुरु केली जाते. परंतु, ती देखील तात्पुरत्या स्वरुपाची. खड्यांत डांबरयुक्त खडी टाकुन तात्पुरती दुरुस्ती उरकली जाते. हि दुरुस्ती काही दिवसांतच पुन्हा उखडुन खड्डे जैसे ते होतात. अथवा खड्यांचा आकार मोठा होऊन वाहनचालकांच्या डोकेदुखीत भर पडते. त्यात अपघाताचे प्रमाण वाढुन अवयवांची दुखणी डोके वर काढतात. शहरात सर्वात जास्त अपघात खड्यांमुळेच होत असल्याचा दावा करीत पवार यांनी आजही शहरातील अनेक वाहतुक रस्त्यांवर खड्यांचे साम्रज्य पसरले असतानाही त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला वेळ नसल्याचा आरोप केला आहे. तक्रारी प्राप्त झाल्यानंतरच त्यावर थातुरमातूर कार्यवाही करुन तक्रारदारांचे समाधान करण्याचा कारभार पालिकेने सुरु केला आहे. रस्त्यांचे बांधकाम टक्केवारीमुळे निकृष्टदर्जाचे होत असल्यानेच अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचा दावा करीत मनविसेचे शहर सचिव पवार यांनी खड्यांच्या कायमस्वरुपी दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे ठोस पर्याय नसल्यास त्यांनी किमान रस्त्यांवरील खड्यांपुर्वी फलके लावुन त्यावर पुढे खड्डे आहेत, वाहने सावकाश चालवा, असा उल्लेख असलेली फलके लावण्याची उपहासात्मक मागणी थेट परिवहन आयुक्तांकडे केली आहे. यामुळे पुढे खड्डे असल्याची खात्री होऊन वाहनचालक वाहने सावकाश चालवुन संभाव्य अपघातापासुन वाचु शकतो, असा कयास लावण्यात आला आहे. त्याचे निवेदन त्यांनी परिवहन आयुक्तांसह स्थानिक वाहतुक शाखेचे वरीष्ठ निरीक्षक जगदिश शिंदे यांना दिले. यावेळी मनविसेचे महेश वाघमारे, अक्षय पिसे, साई परब, विश्वास गवस, तृणाल व्हटकर, गणेश बामणे, वैभव ओझा, महेश चव्हाण आदी  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :mira roadमीरा रोड