शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"रामाच्या प्रेमापोटी रावणाच्या गुणांचे अवमूल्यन करू नका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 18:49 IST

Dr R M Shejwalkar : शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांच्या 'रावणायन ' या  पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. र. म. शेजवलकर बोलत होते.

ठाणे : "रामाचे भक्त सर्व जगात पसरलेले आहेत.रामाचे गुणगान अवश्य करा पण सर्वशक्तिमान अशा रावणाच्या गुणांचे अवमूल्यन कृपया करू नका", असे भावनिक आवाहन ज्येष्ठ लेखक डॉ. र. म. शेजवलकर यांनी केले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका यामिनी पानगावकर यांच्या 'रावणायन ' या  पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रदीप ढवळ, विलास ठुसे, विदुला ठुसे, कवी नवनाथ रणखांबे, निवेदिका प्रज्ञा पंडित, प्रकाशक संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. शेजवलकर म्हणाले, "रामायण हे वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे. वाल्या कोळीचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. कारण रामायण लिहू शकेल इतके शिक्षण त्याकाळी या वर्गाला मिळतच नव्हते. रावणाला कमी लेखून रामायण समजून घेता येणार नाही. विविध भाषेतील अभ्यासकांनी लिहिलेल्या रामायणातील लेखनाचा तटस्थपणे अभ्यास करण्याची गरज आहे. रामायणाचे जेवढे संशोधन होईल तितके नवेनवे आश्चर्यकारक खुलासे कळतील. कोणत्याही ग्रंथाचा एकांगी अभ्यास संशोधनाला मारक ठरतो. लेखिका यामिनी पानगावकर यांनी संशोधनापेक्षा संकलनावर भर दिला आहे. रावण समजून घ्यायचा असेल तर  रावणावर जी मोजकी पुस्तके आहेत. त्यांच्याबरोबरच यामिनी पानगावकर यांचेही रावणायन वाचायला हवे."

वाचक रसिकांचे आभार मानून लेखिका यामिनी पानगावकर म्हणाल्या", विविध पुस्तके वाचताना इंद्रायणी सावकार यांच्य रावणायन पुस्तकाने मी भारावून गेले. रावणावर विविध संस्थामध्ये मी भाषणे केली. मी मांडलेला विषय सर्वांनाच आवडला. त्या रसिकांच्या आग्रहामुळे काढावे असे वाटले. त्यासाठी मी अनेक पुस्तके वाचली. त्यानंतर मला समजलेला रावण मी शब्दबद्ध केला आहे."

"महाभारत आणि रामायण हे ग्रँथ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक वारश्याचे महान शिलालेख असल्याचे सांगून लेखक डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले ", रामायणातील पात्रांमधील ज्याच्याकडे जे चांगले गुण आहेत त्याचा अभ्यास करून  तें वाचकांसमोर मांडणे लेखकाचे खरे कौशल्य असते. हे कौशल्य लेखिका यामिनी पानगावकर यांच्या अंगी आहे. त्या उत्तम वक्त्या आहेतच पण या पुस्तकामुळे चिकित्सक लेखिका म्हणूनही त्या ओळखल्या जातील."

सामाजिक सेवेचा नवा आदर्श निर्माण करण्याऱ्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांना शारदा प्रकाशनाच्यावतीने 'सामाजिक सेवा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. लेखक व्यंकट पाटील यांना ' रणजित देसाई साहित्य पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.यावेळी विदुला ठुसे , अस्मिता येंडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन कवयित्री प्रज्ञा पंडित यांनी केले.या प्रकाशन सोहळ्यास अनेक रसिक ठाणेकर उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे