शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

जिल्ह्यात अकरावीच्या १,१२,०९० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत.

- सुरेश लोखंडे ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत. यामधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. शहरी भाग वगळता यंदाही शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश घेण्याची संधी आहे.यंदाच्या अकरावी प्रवेशासाठीदेखील १० जूनपर्यंत पहिली आॅनलाइन प्रवेश यादी जाहीर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दहावीचा निकाल लवकरच लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. तो लागताच अल्पावधीत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली जाईल. तत्पूर्वी येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. यापैकी भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन अकरावी प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यासाठीदेखील सुमारे १२ हजार ७६० जागा असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक शिक्षण निरीक्षक सुभाष गढरी यांनी सांगितले.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.मागील वर्षी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ३२ हजार ७८० जागा होत्या. यंदा मात्र सुमारे ३८० जागा कमी केल्याचे आढळून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखा प्रवेशासाठी ९६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ६०० प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. या तुकड्यांमध्ये माागील वर्षी तीन हजार ६८२ प्रवेश झाल्याची नोंद आहे. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील. यामध्ये मागील वर्षी तीन हजार २३ प्रवेश झाले होते.>शहरी भागात ९९३०० आॅनलाइन प्रवेशंठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश होणार आहेत. यापैकी कला शाखेचे १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. या वर्षी कला शाखेच्या ९० जागा कमी केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक हजार प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, उर्वरित २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे नियोजन करण्यात आले. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.