शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

जिल्ह्यात अकरावीच्या १,१२,०९० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत.

- सुरेश लोखंडे ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत. यामधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. शहरी भाग वगळता यंदाही शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश घेण्याची संधी आहे.यंदाच्या अकरावी प्रवेशासाठीदेखील १० जूनपर्यंत पहिली आॅनलाइन प्रवेश यादी जाहीर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दहावीचा निकाल लवकरच लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. तो लागताच अल्पावधीत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली जाईल. तत्पूर्वी येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. यापैकी भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन अकरावी प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यासाठीदेखील सुमारे १२ हजार ७६० जागा असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक शिक्षण निरीक्षक सुभाष गढरी यांनी सांगितले.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.मागील वर्षी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ३२ हजार ७८० जागा होत्या. यंदा मात्र सुमारे ३८० जागा कमी केल्याचे आढळून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखा प्रवेशासाठी ९६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ६०० प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. या तुकड्यांमध्ये माागील वर्षी तीन हजार ६८२ प्रवेश झाल्याची नोंद आहे. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील. यामध्ये मागील वर्षी तीन हजार २३ प्रवेश झाले होते.>शहरी भागात ९९३०० आॅनलाइन प्रवेशंठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश होणार आहेत. यापैकी कला शाखेचे १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. या वर्षी कला शाखेच्या ९० जागा कमी केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक हजार प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, उर्वरित २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे नियोजन करण्यात आले. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.