शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जिल्ह्यात अकरावीच्या १,१२,०९० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत.

- सुरेश लोखंडे ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत. यामधील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन यंदा ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. शहरी भाग वगळता यंदाही शहापूर, मुरबाड आणि भिवंडी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आॅफलाइन प्रवेश घेण्याची संधी आहे.यंदाच्या अकरावी प्रवेशासाठीदेखील १० जूनपर्यंत पहिली आॅनलाइन प्रवेश यादी जाहीर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दहावीचा निकाल लवकरच लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत. तो लागताच अल्पावधीत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया हाती घेतली जाईल. तत्पूर्वी येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी एक लाख १२ हजार ९० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. यापैकी भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तीन तालुक्यांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या महाविद्यालयांमध्ये आॅफलाइन अकरावी प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यासाठीदेखील सुमारे १२ हजार ७६० जागा असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे सहायक शिक्षण निरीक्षक सुभाष गढरी यांनी सांगितले.विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.मागील वर्षी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी सुमारे ३२ हजार ७८० जागा होत्या. यंदा मात्र सुमारे ३८० जागा कमी केल्याचे आढळून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखा प्रवेशासाठी ९६० जागा आणि वाणिज्य शाखेसाठी तीन हजार ६०० प्रवेश क्षमता निश्चित केली आहे. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. या तुकड्यांमध्ये माागील वर्षी तीन हजार ६८२ प्रवेश झाल्याची नोंद आहे. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील. यामध्ये मागील वर्षी तीन हजार २३ प्रवेश झाले होते.>शहरी भागात ९९३०० आॅनलाइन प्रवेशंठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरी भागांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश होणार आहेत. यापैकी कला शाखेचे १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. या वर्षी कला शाखेच्या ९० जागा कमी केल्याचे निदर्शनास आले. यामध्ये एक हजार प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, उर्वरित २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे नियोजन करण्यात आले. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा चार हजार ४३० जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील आहेत. तर, चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील.