शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

जिल्ह्यात पाणीटंचाई वाढणार?

By admin | Updated: December 9, 2015 00:46 IST

कल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

मुरलीधर भवार,  कल्याणकल्याण-डोंंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरसह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणात २२० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. सध्या ३० टक्के कपात लागू केल्याने जून अखेरपर्यंत हे पाणी कसेबसे पुरेल, असा दावा लघू पाटबंधारे खात्याने केला असला, तरी मार्च ते जून या काळात पाणीटंचाई तीव्र होत जाईल, अशी चिन्हे आहेत.उन्हाळ््यातील भीषण पाणीटंचाईच्या काळातील व्यवस्थेबाबत स्थानिक स्वराज्य संस्थाकडे अद्याप कोणतेही नियोजन नसल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्याशी केलेल्या चर्चेनंतर समोर आली. पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या घोषणा खुद्द मुख्यमंत्री सतत करत असले तरी त्यादृष्टीने कोणत्याही पथदर्शी प्रकल्पाची आखणी एकाही पालिकेने केलेली नाही. बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचे आहे; तर भिवपुरी येथील आंध्र धरण टाटा कंपनीच्या मालकीचे आहे. या दोन्ही धरणातून उल्हास नदीत दररोज जवळपास एक हजार दशलक्ष लिटर पाणी सोडले जाते. उल्हास नदीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम पाणीपुरवठा योजना आणि कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. सध्या बारवी धरणात १३९.८६ घन दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे; तर आंध्र धरणात ११४.५९ घन दक्षलक्ष लिटर पाण्याचा साठा आहे. म्हणजे या दोन्ही धरणाचे पाणी २२० दिवस पुरेल.आंध्रातील पाण्यापासून टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती करते. त्यामुळे येथून दररोज चारशे ते पाचशे दशलक्ष लिटर पाणी उल्हास नदीत सोडले जाते. जोवर नदीच्या पाण्याचा प्रवास सुरळीत आणि पुरेसा असतो. तसेच पाण्याची पातळी खालावलेली नसते, तोवर बारवीतून पाणी सोडत नाहीत. या वर्षी १५ आॅक्टोबरपासूनच पाणी सोडावे लागले.> एमआयडीसीने उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. हा पुरवठा बुधवार ९ डिसेंबरला रात्री १२ ते शुक्र वारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळवा, मुंब्रा, दिवा, बाळकुम पाडा क्र .१, कोलशेत या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामधून रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी हा भाग वगळण्यात आला आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. > कल्याण-डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत १५० कोटी रुपयांची पाणीयोजना सुरू केली. यापूर्वी पाण्यासाठी महापालिका औद्योगिक विकास महामंडळावर पूर्णपणे अवलंबून होती. महापालिका महामंडळाकडून जास्त दराने पाणी घेऊन नागरिकांना कमी दर आकारत होती. स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित झाल्यावर जलशुद्धीकरण पालिका करणार असल्याने खर्च वाचेल आणि नागरिकांना स्वस्त दरात पाणी मिळेल, असे सांगितले जात होते. योजना सुरू झाल्यावरही पाण्याचा दर हजार लिटरचा दर कायमच राहिला. तो कमी झाला नाही. मात्र गेल्या तीन वर्षात पाण्याचे दर वाढविले नसल्याने वेगळ््या शब्दांत पाणी स्वस्त असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. >