शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आरटीईच्या १३ हजार जागांसाठी जिल्ह्यातून २०,६६७ ऑनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 11:59 PM

शिक्षण विभागाची माहिती : आता सोडतीची अपेक्षा

सुरेश लोखंडेठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्यानुसार जिल्ह्यातील समाजामधील एससी, एसटी, वंचित आणि दुर्बल घटक प्रवर्गातील बालकांना पहिली ते केजीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील ६६९ शाळांमधील प्रवेशांपैकी रिक्त ठेवलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी बुधवारी शेवटच्या मुदतीपर्यंत २० हजार ६६७ आॅनलाइन अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले. त्यातून या आठवड्यात लॉटरी सोडतीद्वारे अपेक्षित शाळांमध्ये प्रवेश निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

१२ हजार ९१३ राखीव जागांवरील शालेय प्रवेशासाठी ६६९ शाळांची निवड केली आहे. यामध्ये पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना प्रवेश मिळणार आहे. पूर्वप्राथमिकसाठी एक हजार ३३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

अंबरनाथ तालुक्यामधून एक हजार ९९५ अर्ज, भिवंडी-१ ला दोन हजार १९७, भिवंडीला ६३८, कल्याणला एक हजार ८८७, कल्याण-डोंबिवलीला दोन हजार २६६, मीरा-भार्इंदरला १६१, मुरबाडला ६२, ठाणे मनपा क्षेत्रात एक हजार ३४३, ठाणे मनपा २ मध्ये तीन हजार १४३ आणि उल्हासनगर शहरातून एक हजार ६३, नवी मुंबई पाच हजार ३००, तर शहापूरमधून ५९२ आॅनलाइन अर्ज प्रवेशासाठी आले आहेत.

एकूण प्रवेशासाठी वंचित घटकातील प्रवर्गास, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालक, एकाकी पालकांची बालके आदीना आॅनलाइन अर्ज दाखल करता येतो.शिक्षण हक्क कायद्यान्वये ठाणे जिल्ह्यात एकूण १२ हजार ९१३ जागा राखीव आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी यंदाही लॉटरी सोडतद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत रिक्त जागांपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. यंदा सात हजार ७५४ ऑनलाइन अर्ज जास्त आले आहेत. 

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा