शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यात ३,४९४ बालकांनी आरटीई प्रवेश नाकारले, शिक्षण विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 10:02 IST

यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली दुर्बल घटक आणि मागासवर्गीय परिवारांतील बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत २५ टक्के शालेय प्रवेश मोफत दिले जात आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ९,३२६ मुलांची लॉटरी सोडतद्वारे निवड झाली. यापैकी ५,६७७ जणांचे प्रवेश झाले असून १५२ जणांना विविध कारणांखाली प्रवेश नाकारले आहेत. उर्वरित ३,४९४ बालकांच्या प्रवेशासाठी आईवडील शाळेत गेले नाहीत. त्यामुळे त्यांनी प्रवेश नाकारल्याचे उघड झाले आहे.

यंदा ६६९ शाळांमध्ये ‘आरटीई’खाली प्रवेश दिले गेले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सीनिअर केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश दिले जात आहेत. या प्रक्रियेनंतर प्रतीक्षायादीतील १,८९४ बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. मात्र, यातील १३४ जणांनीच प्रवेश घेतले आहेत. तर, १,७५८ बालकांचे पालक प्रवेशासाठी शाळेत गेलेले नाहीत. उर्वरित बालकांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पण, लाॅकडाऊनमुळे प्रवेश रखडले होते. यामुळे निवड प्रक्रियेची वाट न बघता पालकांनी त्यांच्या परिने या शाळांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, अनेक पालकांना विविध समस्या, शाळांकडून मार्गदर्शन न झाल्यामुळे मुलांचे प्रवेश घेता आलेले नाहीत. 

आजपर्यंत १३४ जणांना प्रवेश मिळाले आहेत. उर्वरित निवड झालेल्या १,७९२ मुलांचे पालक मार्गदर्शनाअभावी गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रवेश रखडले आहेत. यासाठी जूनमध्ये सोडतीद्वारे निवड झालेली आहे. प्रवेशाची शाळा प्रशासनाने एसएमएसद्वारे पालकांना कळवली आहे.

तक्रार क्रमांक 1-प्रवेश नाकारलेल्या बालकांच्या पालकांकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे काही बालकांचे प्रवेश नाकारले आहेत.

तक्रार क्रमांक 2 -जातीचा दाखला नसल्यामुळेही प्रवेश नाकारले. परराज्यांतील जातीचे दाखले असल्याच्या कारणाखालीही प्रवेश दिला नाही.

२३ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घ्या -प्रतीक्षायादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश २३ तारखेपर्यंत दिलेल्या शाळेत पालकांनी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्ससह अलॉटमेंट लेटरची प्रत सोबत न्यावी. पालकांनी मुलांना शाळेत घेऊन जाऊ नये.             - समिना शेख, शिक्षणाधिकारी (प्र.), जि.प. ठाणे 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीthaneठाणे