शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीचा वाद थेट पवारांच्या दरबारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 14:43 IST

Mira Bhayander Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून दिड महिना झाला नाही तोच स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता अंकुश मालुसरे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने विरोध

मीरारोड - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून दिड महिना झाला नाही तोच स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता अंकुश मालुसरे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या दरबारी पोहचले .राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष सोडून जाणारे पदाधिकारी - नेते आता महाविकास आल्या नंतर पुन्हा राष्ट्रवादीत घर वापसी करू लागले आहेत . मीरा भाईंदर मध्ये देखील माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील व आसिफ शेख सह माजी महापौर निर्मला सावळे आदी अनेकांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला . मालुसरे सुद्धा राष्ट्रवादीत परत आले .शहरात एकेकाळी सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बळकट करायची तर सक्षम - लोकाभिमुख नेतृत्वाची उणीव असली तरी पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच २ फेब्रुवारी रोजी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले .त्यातूनच पेंडुरकर सह पक्षाच्या पदधकाऱ्यांनी मालुसरे यांच्या नियुक्ती विरोधात संताप व्यक्त करत त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले . त्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा घडला प्रकार सांगण्यात आला . यावेळी मसूलरे यांच्या बद्दलच्या असलेल्या तक्रारी सुद्धा नेत्यानं समोर मांडण्यात आल्या . पवार व सुप्रिया यांनी आपण जातीने प्रदेशाध्यक्षांशी बोलून माहिती घेऊ असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले .मालुसरे यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीची माहिती मीरा भाईंदरचे निरीक्षक संतोष धुवाळी यांना सुद्धा नसल्याची चर्चा आहे . राष्ट्रवादीच्या फ्रन्टल सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी , ब्लॉक अध्यक्ष , जिल्हा समिती पदाधिकारी , बूथ अध्यक्ष आदींनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हितासाठी मालुसरे यांच्या नियुक्तीला विरोध केला असल्याचे पेंडुरकर म्हणाले .

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliticsराजकारण