शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

स्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:45 IST

घनकचरा व्यवस्थापन विभाग करतो काय : महापालिकेच्या कारभाराचा केला ‘कचरा’

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत ठाणे महापालिकेचा क्रमांक दरवर्षी घसरत असताना आता हा क्रमांक सुधारण्याच्या नावाखाली सल्लागार नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कचरा, त्याची विल्हेवाट लावणे, उपाययोजना, वाहतूक, कचरा प्रक्रियाच्या विविध पद्धती आदींसह इतर उपाय करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. याचाच अर्थ पालिका कचऱ्याची समस्या सोडविण्यात कमी पडत असल्यानेच आता ती सोडविण्यासाठी खाजगी संस्थेचा घाट घालण्याचे काम सुरूझाले असून दोन वर्षांसाठी ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.

महापालिकेने यंदा पुन्हा स्वच्छ भारत अभियनाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र, मागील काही वर्षांत पालिकेचा क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत घसरला आहे. स्वच्छतेमध्ये क्रमांक यावा यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा चुराडा केला जात आहे. असे असताना आता पुन्हा कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिका कमी पडत असल्याने ती सोडविण्यासाठी खाजगी सल्लागार समितीची नेमणूक केली जाणार आहे. महापालिका हद्दीत १ हजार मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होत आहे. त्यानुसार कचºयाचे संकलन, साठवणूक, वाहतूक व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ही कामे पालिकेकडून सुरू आहेत. तसेच शहरात निर्माण होणारा बांधकाम तोडफोड तरतुदीनुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. शहराची साफसफाई व रिफ्युज कॉम्पॅक्टरची व्यवस्था केलेली आहे. दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या, डोंगरउतरावरील वस्त्या ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सामाजिक संस्था, बचत गटाची नियुक्ती करुन त्यांच्यामार्फत घरोघरी कचरा संकलन करण्याची कार्यवाही सुरूआहे. त्यानुसार शहरातील ६०० मेट्रिक टन कचºयाची बंद कंटेनरमधून वाहतूक करण्यात येत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यामध्ये विकेद्रींत पद्धतीने ५-५ टन क्षमतेचे बायोमिथेन गॅस, मॅकेनिकल कंपोस्टिंग व बायोकंपोस्टिंग या तंत्रज्ञानावर आधारीत रोज १०० टन कचºयाची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे काम सुरूआहे.

डम्पिंगपासून कचरा वर्गीकरणात महापालिका नापासडायघर येथे पहिल्या टप्यात ६०० मेट्रिक टन व दुसºया टप्यात ६०० मेट्रिक टन असे एकूण १२०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून हे केंद्रीत पद्धतीने काम केले जाणार आहे. बांधकाम तोडफोड कचरा १०० मेट्रिक टन तयार होत असून त्यावर सुद्धा प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.

त्यानुसार आता स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेची अंमलबजावणी ही चार टप्प्यात करण्यात येत असून एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत घेण्यात येत आहे. परंतु,पालिकेने पुन्हा एकदा विविध प्रकल्पांचे अवलोकन केले असले तरी अद्यापही महापालिकेला स्वत:चे हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळू शकलेले नाही.शिवाय ओला आणि सुक्या कचºयाची समस्या सुटू शकलेली नाही, शास्त्रोक्तपद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्यात पालिका आजही अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे पालिकेचा क्रमांक दरवर्षी या स्पर्धेत घसरतांना दिसत आहे. असे असतांना आता स्वच्छतेचा क्रमांक सुधारण्यासाठी पालिकेने या कामासाठी सल्लागार समिती नेमण्याचा घाट घातला असून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाºया महासभेत पटलावर ठेवला आहे. दोन वर्षांच्या कामासाठी तब्बल ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाला टाळे लावामहापालिकेकडे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन विभाग असून या विभागात शेकडो अधिकारी-कर्मचाऱ्यांसह हजारो सफाईकामगार आहेत. दरवर्षी या विभागावर कोट्यवधींचा खर्च होता. शेकडो कोटींची मशिनरी या विभागासाठी तैनात असते. मग या विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्वच्छतेसाठी झटण्याऐवजी नुसत्या खुर्च्या उबवतात काय असा संतप्त सवाल आता ठाणेकर करू लागले आहेत. सल्लागार नेमून त्यावर पावणेचार कोटींची उधळण करायचीच असेल तर या पुरता कचरा झालेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी कायमचे टाळे लावावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका