शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

स्वच्छ ठाण्यासाठी सल्लागारावर पावणेचार कोटींची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 01:45 IST

घनकचरा व्यवस्थापन विभाग करतो काय : महापालिकेच्या कारभाराचा केला ‘कचरा’

ठाणे : स्वच्छ भारत अभियानाच्या स्पर्धेत ठाणे महापालिकेचा क्रमांक दरवर्षी घसरत असताना आता हा क्रमांक सुधारण्याच्या नावाखाली सल्लागार नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यानुसार शहरात निर्माण होणारा कचरा, त्याची विल्हेवाट लावणे, उपाययोजना, वाहतूक, कचरा प्रक्रियाच्या विविध पद्धती आदींसह इतर उपाय करण्यासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. याचाच अर्थ पालिका कचऱ्याची समस्या सोडविण्यात कमी पडत असल्यानेच आता ती सोडविण्यासाठी खाजगी संस्थेचा घाट घालण्याचे काम सुरूझाले असून दोन वर्षांसाठी ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे.

महापालिकेने यंदा पुन्हा स्वच्छ भारत अभियनाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मात्र, मागील काही वर्षांत पालिकेचा क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत घसरला आहे. स्वच्छतेमध्ये क्रमांक यावा यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधींचा चुराडा केला जात आहे. असे असताना आता पुन्हा कचºयाची समस्या सोडविण्यासाठी पालिका कमी पडत असल्याने ती सोडविण्यासाठी खाजगी सल्लागार समितीची नेमणूक केली जाणार आहे. महापालिका हद्दीत १ हजार मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होत आहे. त्यानुसार कचºयाचे संकलन, साठवणूक, वाहतूक व शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ही कामे पालिकेकडून सुरू आहेत. तसेच शहरात निर्माण होणारा बांधकाम तोडफोड तरतुदीनुसार विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. शहराची साफसफाई व रिफ्युज कॉम्पॅक्टरची व्यवस्था केलेली आहे. दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या, डोंगरउतरावरील वस्त्या ज्या ठिकाणी कोणतेही वाहन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी सामाजिक संस्था, बचत गटाची नियुक्ती करुन त्यांच्यामार्फत घरोघरी कचरा संकलन करण्याची कार्यवाही सुरूआहे. त्यानुसार शहरातील ६०० मेट्रिक टन कचºयाची बंद कंटेनरमधून वाहतूक करण्यात येत आहे. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यामध्ये विकेद्रींत पद्धतीने ५-५ टन क्षमतेचे बायोमिथेन गॅस, मॅकेनिकल कंपोस्टिंग व बायोकंपोस्टिंग या तंत्रज्ञानावर आधारीत रोज १०० टन कचºयाची विल्हेवाट वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे काम सुरूआहे.

डम्पिंगपासून कचरा वर्गीकरणात महापालिका नापासडायघर येथे पहिल्या टप्यात ६०० मेट्रिक टन व दुसºया टप्यात ६०० मेट्रिक टन असे एकूण १२०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून हे केंद्रीत पद्धतीने काम केले जाणार आहे. बांधकाम तोडफोड कचरा १०० मेट्रिक टन तयार होत असून त्यावर सुद्धा प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे.

त्यानुसार आता स्वच्छ सर्वेक्षण २०२० स्पर्धेची अंमलबजावणी ही चार टप्प्यात करण्यात येत असून एप्रिल ते जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबर ते डिसेंबर आणि १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत घेण्यात येत आहे. परंतु,पालिकेने पुन्हा एकदा विविध प्रकल्पांचे अवलोकन केले असले तरी अद्यापही महापालिकेला स्वत:चे हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळू शकलेले नाही.शिवाय ओला आणि सुक्या कचºयाची समस्या सुटू शकलेली नाही, शास्त्रोक्तपद्धतीने कचºयाची विल्हेवाट लावण्यात पालिका आजही अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे पालिकेचा क्रमांक दरवर्षी या स्पर्धेत घसरतांना दिसत आहे. असे असतांना आता स्वच्छतेचा क्रमांक सुधारण्यासाठी पालिकेने या कामासाठी सल्लागार समिती नेमण्याचा घाट घातला असून या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाºया महासभेत पटलावर ठेवला आहे. दोन वर्षांच्या कामासाठी तब्बल ३ कोटी ६३ लाख ८० हजार ४०० रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाला टाळे लावामहापालिकेकडे स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन विभाग असून या विभागात शेकडो अधिकारी-कर्मचाऱ्यांसह हजारो सफाईकामगार आहेत. दरवर्षी या विभागावर कोट्यवधींचा खर्च होता. शेकडो कोटींची मशिनरी या विभागासाठी तैनात असते. मग या विभागाचे अधिकारी-कर्मचारी स्वच्छतेसाठी झटण्याऐवजी नुसत्या खुर्च्या उबवतात काय असा संतप्त सवाल आता ठाणेकर करू लागले आहेत. सल्लागार नेमून त्यावर पावणेचार कोटींची उधळण करायचीच असेल तर या पुरता कचरा झालेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला आयुक्तांनी कायमचे टाळे लावावे, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका