शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जलप्रदूषणाचा विळखा, केडीएमसी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:53 IST

प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या समितीच्या पाहणीनंतर हे उघड झाले आहे. कामाची गती पाहता पुढची डेडलाइन तरी पाळली जाणार की नाही, याविषयी साशंकता आहे.

‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर १० एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान १७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे पर्यावरण खात्याच्या सचिवांना आदेश दिले आहे. तसेच दर १५ दिवसांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रियेचे काम कितपत प्रगतीपथावर आले आहे, याची पाहणी केली. समितीचे सदस्य ३० एप्रिलला आले होेते. ही पाहणी दोन दिवस चालली. पाहणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे की, आठ नाल्यांचा प्रवाह वळवून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेले जाईल. आठ नाल्यांपैकी काही मोजक्याच नाल्यांचा प्रवाह वळता झाला आहे. ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह वळवणे अपेक्षित असताना आठ दशलक्ष लीटर चा प्रवाह केंद्राकडे वळवल्याची बाब समितीच्या लक्षात आली.

महापालिकेने सांडपाणी वळते करण्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. हे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याची डेडलाइन होती. डेडलाइन पुढे गेल्यामुळे समिती पाच दौरे दर १५ दिवसांनी करणार आहे. त्यानंतर, या अपूर्ण कामांचा अहवाल दिला जाईल. न्यायालय १७ जुलैला काय आदेश देईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीची २०२० ची डेडलाइनही पाळली जाणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

प्रदूषण मंडळाच्या नोटिशीला मोघम उत्तरडोंबिवली औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहिन्या फुटल्या आहेत. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला २६ एप्रिलला नोटीस बजावली. ही नोटीस मिळताच फुटलेल्या रासायनिक सांडपाण्याच्या वाहिन्यांची पाहणी एमआयडीसीने करून दुरुस्ती केली जाईल, असे मोघम उत्तर मंडळास दिले गेले.

आठवडाभरापूर्वी केडीएमसीच्या हद्दीतील तीन कत्तलखाने २४ तासांत बंद करण्याची नोटीस मंडळाने महापालिकेला दिली होती. महापालिकेने या नोटिशीनंतर कत्तलखाने बंद केलेले नसून त्यात पत्रीपूल येथील जुन्या कत्तलखानाही समावेश आहे. महापालिकेनेही प्रक्रिया करू, यंत्रणा उभारू, असे उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाwater pollutionजल प्रदूषण