शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जलप्रदूषणाचा विळखा, केडीएमसी उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:53 IST

प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे.

मुरलीधर भवारकल्याण : प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडले जात असल्याने नदी आणि खाडीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी किमान ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याच्या नाल्यांपैकी केवळ आठ दशलक्ष लीटर पाण्याचा प्रवाह सांडपाणी केंद्राकडे वळवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झालेल्या समितीच्या पाहणीनंतर हे उघड झाले आहे. कामाची गती पाहता पुढची डेडलाइन तरी पाळली जाणार की नाही, याविषयी साशंकता आहे.

‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेतर्फे दाखल केलेल्या याचिकेवर १० एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान १७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे पर्यावरण खात्याच्या सचिवांना आदेश दिले आहे. तसेच दर १५ दिवसांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल द्यावा, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक समिती स्थापन केली आहे. या समितीने कल्याण-डोंबिवलीतील सांडपाणी प्रक्रियेचे काम कितपत प्रगतीपथावर आले आहे, याची पाहणी केली. समितीचे सदस्य ३० एप्रिलला आले होेते. ही पाहणी दोन दिवस चालली. पाहणी करणाऱ्या समितीच्या असे निदर्शनास आले आहे की, आठ नाल्यांचा प्रवाह वळवून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे नेले जाईल. आठ नाल्यांपैकी काही मोजक्याच नाल्यांचा प्रवाह वळता झाला आहे. ६० दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह वळवणे अपेक्षित असताना आठ दशलक्ष लीटर चा प्रवाह केंद्राकडे वळवल्याची बाब समितीच्या लक्षात आली.

महापालिकेने सांडपाणी वळते करण्याचे काम फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. हे काम डिसेंबर २०१८ अखेर पूर्ण करण्याची डेडलाइन होती. डेडलाइन पुढे गेल्यामुळे समिती पाच दौरे दर १५ दिवसांनी करणार आहे. त्यानंतर, या अपूर्ण कामांचा अहवाल दिला जाईल. न्यायालय १७ जुलैला काय आदेश देईल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीची २०२० ची डेडलाइनही पाळली जाणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

प्रदूषण मंडळाच्या नोटिशीला मोघम उत्तरडोंबिवली औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहिन्या फुटल्या आहेत. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला २६ एप्रिलला नोटीस बजावली. ही नोटीस मिळताच फुटलेल्या रासायनिक सांडपाण्याच्या वाहिन्यांची पाहणी एमआयडीसीने करून दुरुस्ती केली जाईल, असे मोघम उत्तर मंडळास दिले गेले.

आठवडाभरापूर्वी केडीएमसीच्या हद्दीतील तीन कत्तलखाने २४ तासांत बंद करण्याची नोटीस मंडळाने महापालिकेला दिली होती. महापालिकेने या नोटिशीनंतर कत्तलखाने बंद केलेले नसून त्यात पत्रीपूल येथील जुन्या कत्तलखानाही समावेश आहे. महापालिकेनेही प्रक्रिया करू, यंत्रणा उभारू, असे उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाwater pollutionजल प्रदूषण