उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी बुधवारी दुपारी भेट घेऊन शहर समस्यांचा पाडा वाचला. समस्यांचे निराकरण करण्याची मागणी दोन्ही आमदाराकडून यावेळी केली असून आयुक्तानी समस्या निराकरणाचे आश्वासन दिले. उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचे पुनर्विकास, ट्रांजिट कॅम्प, पाणीपुरवठ्यातील विसंगती, दूषित पाणी, रस्त्यांवरील खड्डे, उद्यानांची अस्वच्छता, अनधिकृत इमारतींना नियमबद्ध करण्याची प्रक्रिया, अग्निशमन दल व नवीन बसेसचे उद्घाटन आदी समस्यांचा पाडा आमदार कुमार आयलानी व सुलभा गायकवाड यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या समोर वाचला.
अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या फाईल्स पालिकाकडे धूळ खात पडल्या आहेत. त्याचे शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी. असीही मागणी यावेळी केली. त्यावेळी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आजपासूनच ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
शासनाच्या आदेशानुसार टेंडर प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी. ठेकेदारात याबाबत नाराजी निर्माण झाल्याची माहिती आयलानी यांनी दिली. या बैठकीस आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रशांत पाटील, टोनी सिरवानी, एस. बी. सिंग, दीपक छतलानी, अमर लुंड आदी मान्यवर उपस्थित होते.
उल्हास नदी घाटाच्या बांधकामा बाबत राज्य पाटबंधारे विभागाने कारवाईचे आदेश महापालिका आयुक्ताना दिले. मात्र आयुक्त व आमदारांच्या बैठकीत उल्हास नदी घाटाचा प्रश्न उपस्थित न झाल्याने, वेगळ्याच चर्चेला शहरांत उधाण आले आहे.