शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजपच्या इच्छुकांच्या पदरी जिल्ह्यात निराशा?; एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:04 IST

अनेकांना करावी लागणार तडजोड

ठाणे : मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाची खाती मिळावी याकरिता शिवसेनेचा हट्ट कायम असल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली असतानाही भाजपमधील काही नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर राहावे लागू शकते, अशी दाट शक्यता आहे.

भाजपने २६ खाती आपल्याकडे ठेवताना शिवसेनेला १३ खाती देण्याचा प्राथमिक प्रस्ताव दिला आहे. परंतु, वाटाघाटींमध्ये ही संख्या १८ पर्यंत खेचण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपने आयारामांना घेतल्याने व त्यांना विविध पदांचे आश्वासन दिले असल्याने ते पाळण्यासाठी भाजपची कसरत सुरू झाली आहे. अशातच पक्षातील इतरांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मागील सरकारमध्ये भाजपच्या काही मंत्र्यांकडे तीन ते चार खाती होती. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भाजपच पुन्हा एकदा मोठा तर शिवसेना छोटा भाऊ ठरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात आपल्याला स्थान प्राप्त व्हावे, अशी भाजपच्या आमदारांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. मात्र सत्तेकरिता शिवसेनेची भाजपला गरज आहे हे हेरून भाजपने अनेक महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. वाटाघाटीत शिवसेना सरस ठरली तर सेनेला साथ देणाऱ्या मुंबई व ठाण्यातील दोन किंवा तीन टर्म विजयी होणाऱ्यांना मंत्रिमंडळात सेना संधी देईल. साहजिकच युतीच्या सरकारमध्ये मोठा भाऊ या नात्याने प्रादेशिक, जातीय व अन्य समतोल साधणे ही जबाबदारी भाजपची असेल. एकाच जिल्ह्याला चार-पाच मंत्रिपदे दिली तर त्यामुळे अन्य जिल्ह्यांत त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते.गणेश नाईक यांना बाहेर ठेवणे भाजपला अशक्यगणेश नाईक यांना भाजपने अलीकडेच पक्षात घेतले. नाईक यांच्याकडे मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला बाहेर ठेवणे भाजपकरिता अशक्य आहे. अर्थात नाईक यांच्याकरिता भाजपने बेलापूर विधानसभा मतदारसंघ सोडला नव्हता. त्यामुळे ऐरोलीतून पुत्र संदीप याला माघार घ्यावी लागली होती. जिल्ह्यातील भाजपचे मूळ नेते व राष्ट्रवादीतून २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले काही आमदार यांचा नाईक यांना संधी देण्यास व त्यांचे महत्त्व वाढवण्यास विरोध आहे. त्यांनी दबाव टाकला तर नाईक यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाऊ शकते. रवींद्र चव्हाण हे राज्यमंत्री होते. यावेळी त्यांची कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र शिवसेनेला वन, गृहनिर्माण, ग्रामविकास अशी काही खाती गेली तर चव्हाण यांचे कॅबिनेट मंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. भाजपकडे नगरविकास, गृह आदी खात्यांशी संबंधित राज्यमंत्रिपदे शिवसेनेकडे गेल्यास राज्यमंत्रिपदावरील भाजप आमदारांना कमी महत्त्वाची खाती मिळतील.किसन कथोरे हे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदावरील दावा बळकट आहे. कथोरे यांचा शहरी विभागाशी संबंध असून ते प्रतिनिधित्व आदिवासी लोकसंख्या असलेल्या भागाचे करतात. मात्र कथोरे हे ज्येष्ठ नेते असून त्यांना त्यांच्या तोलामोलाचे खाते अपेक्षित असताना सेनेसोबत सुरू असलेल्या रस्सीखेचीत त्यांच्या पदरात काय पडते, याबाबत उत्सुकता आहे.संजय केळकर यांनी ठाणे हा एकेकाळी शहरातील मध्यवर्ती भागातील शिवसेनेचा गड दुसºयांदा जिंकला आहे. सेनेला शह देण्याकरिता केळकर यांचा मंत्रिपदाकरिता विचार केला जाऊ शकतो. मात्र मुख्यमंत्री ब्राह्मण असताना मंत्रिमंडळात आणखी एक ब्राह्मण चेहरा सामावून घेतला जाईल किंवा कसे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

टॅग्स :BJPभाजपा