शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

दिघी-वाढवण बंदरसाठी प्रयत्न करणार - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 01:51 IST

येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल.

म्हसळा : कोकणाच्या विकासासाठी येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील दिघी आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण येथील बंदरे पूर्ण व्हावीत, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे सांगितले. 

येत्या काळात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिकरण वाढविण्यावर भर दिला जाईल. मात्र येथे रसायनमुक्त कारखानदारी येईल, याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पंचायत समिती, बॅ. ए. आर. अंतुले भवन आणि म्हसळा येथील विज्ञान महाविद्यालयाचे बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय असे नामकरण करण्याचा कार्यक्रम कोकण उन्नती मंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तेव्हा ते बोलत होते.

कोकणात मागास राहिलेल्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा हवा तेवढा विकास होऊ शकला नाही. कोकण हे भाताचे कोठार आहे. येथे कृषी आणि मत्स्य व्यवसायाला मोठया प्रमाणात चालना मिळाली. आता येथे बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. कोकणातील दिघी बंदर आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या घरी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केंद्राच्या संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे पवार यांनी सांगितले. रेवस- रेडी रस्ता लवकरच विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे आग्रह धरला जाईल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार